
छत्रपती संभाजीनगर : चिन्मोय प्रभू जर दोषी असतील तर न्यायालय त्याचा फैसला करेल. त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांवर हल्ले करून बांगलादेशी वकील मंडळी हेच सिद्ध करत आहेत की की ते निर्दोष आहेत. दोषी असते तर हे हल्ले करण्याची गरजच काय? असा सवाल करत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी बांगलादेशात हिंदूवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आता पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
या संदर्भात इस्काॅनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील मिळू दिला जात नाही, या संदर्भातील एक व्हिडिओ आणि तेथील वकील संघटनांनी घेतलेली भूमिका यावर दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रश्नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधत त्यांना विनंती केली आहे. आता या प्रश्नावर पाऊले टाकण्याची वेळ आली आहे.
एखाद्याला वकील न मिळू देणे आणि असले हल्ले करणे हे मानवतेला आणि न्यायला धरून नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे. (Narendra Modi) दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चिन्मयो प्रभू यांच्या समर्थनाथ आंदोलन करत बांगलादेशचा निषेध केला होता. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात तुम्ही आमच्या तिरंग्याचा अपमान कराल तर आम्हाला तुमचा झेंडा पेटवता येतो.
तुम्ही तिथे हिंदूंना आणि इस्कॉनला त्रास देणार असाल तर आम्हाला तुमच्यावर आर्थिक निर्बंध लादावे लागतील. महाराष्ट्रात आता बांगलादेशी खेळाडूंना आम्ही खेळू देणार नाही, असा इशारा देतानाच बस्स! केंद्राने याकडे आता गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले होते. करु नका हिंदू द्वेष..शांत ठेवा बांगलादेश, इस्कॉन मानवतावादी, नाही दहशतवादी अशा घोषणा या आंदोलनात देण्यात आल्या होत्या.
बांगलादेशात हिंदू समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्याय, अत्याचार व दडपशाही रोखा, भारतीय ध्वज तिरंग्याचा अपमान करणाऱ्या धर्मद्वेषी बांग्लादेशींना प्रत्युत्तर देत हिंदू समाजाचा सन्मान टिकावा यासाठी उपरोधिक बांगलादेशाचा ध्वज शिवसेनेच्या वतीने जाळण्यात आला होता. त्यानंतर आज अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालत बांगलादेशात हिंदू आणि इस्काॅनचे प्रमुख चिन्मयो प्रभू यांच्यावर होत असलेला अन्याय रोखण्याची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.