Beed Crime : संतोष देशमुखांच्या हत्येनं हादरलेल्या बीडमध्ये पुन्हा 2 सख्ख्या भावांच्या हत्येचा थरार

Beed Crime News Update : सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर कळंबा गावचे सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. तर राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने अंबाजोगाई तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 17 Jan : मागील काही दिवसांपासून बीडमध्ये सुरू असलेल्या धक्कादायक घटनांची मालिका संपायचं नाव घेईना. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या हत्येमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. त्यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर कळंबा गावचे सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. तर त्यानंतर राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने अंबाजोगाई तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या सर्व घटनांमुळे बीडमधील (Beed) गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

या सर्व घटनांमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये पारधी समाजातील दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या हत्येमुळे आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अजय भोसले आणि भरत भोसले या सख्ख्या भावांची हत्या त्यांच्या नातेवाईकांनीच केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकासोबत जुना वाद होता. याच वादातून नातेवाईकाने गुरूवारी (ता.16) रात्री या दोघांवर चाकूने हल्ला करत त्यांची हत्या केली.

Beed Crime News
Dhananjay Munde News : सोडताही येईना, धरताही येईना...! कार्यकर्त्यांसाठी कराड हिरो हीच मुंडेंची सर्वात मोठी अडचण!

हे दोघे आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे असून गावापासून 5 किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन्ही भावांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यासाठी आणण्यात आले आहेत. मात्र, या दोन भावांच्या हत्येमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

Beed Crime News
Narendra Modi : 'स्थानिक'साठी महायुतीत स्वबळाचं टुमकं वाजवणाऱ्यांना PM मोदींचा मोठा झटका; मित्रपक्षांना सांभाळण्याचा का दिला सल्ला...

संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आधीच या जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. हत्येचा सुत्रधार म्हणून वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोक्का अंतरगत कारवाईमुळे त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिल्यामुळे परळीतील वातावरण तापलं आहे. अशातच आता या दोन भावांची हत्या झाल्यामुळे बीडमधील गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com