Massajog Villagers Decision : मस्साजोग ग्रामस्थांचा मोठा निर्णय; ‘आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत गावात एकही सण साजरा करणार नाही’

Santosh Deshmukh Murder Case : देशमुख यांच्या खुनामुळे आमच्या गावात सुतक पडलंय. जे सुतक दहाव्याला फिटतंय. पण आमच्या गावात पडलेले सूतक हे जोपर्यंत देशमुख खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत सुटणार नाही, असेही गावकऱ्यांनी स्पष्ट केले.
Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Beed, 14 March : महाराष्ट्रात आज धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, संतोष देशमुख यांच्या निर्घृण खून प्रकरणामुळे मस्साजोग ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशमुख यांच्या खूनप्रकरणातील आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत गावात एकही सण साजरा करायचा नाही, आनंदोत्सव साजरा करायचा नाही, असा निर्णय बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांनी घेतला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या खून प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत. संतोष देशमुख या प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरारी आहे. या प्रकरणाची बीडमध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज धुलीवंदनाचा सण सगळीकडे जल्लोषात साजरा केला जात असताना मस्साजोगमध्ये मात्र सुतकी वातावरण होते.

यासंदर्भात मस्साजोगचे (Massajog ) ग्रामस्थ म्हणाले, आमच्या गावात होळी आणि धुलीवंदनाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. धुलीवंदनासाठी सरपंच संतोष देशमुख हे प्रामुख्याने हजर असायचे. पण, देशमुख यांच्या खुनामुळे आमच्या गावात सुतक पडलंय. जे सुतक दहाव्याला फिटतंय. पण आमच्या गावात पडलेले सूतक हे जोपर्यंत संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत सुटणार नाही, असेही गावकऱ्यांनी स्पष्ट केले.

Santosh Deshmukh
Jayant Patil News : जयंत पाटील बारामतीत, पवारांसोबत फेरफटका; म्हणाले, एकट्यानं इकडं, तिकडं जाणं...

विढा परिसरात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र, यावर्षी त्यांनी ही परंपरा खंडीत केली आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत मस्साजोग ग्रामस्थांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संतोष देशमुख हे सरपंच जरी असले तरी ते धुलीवंदनाच्या सणात सहभागी होत असत. चूक नसताना संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे, त्यामुळे आम्ही होळी, धुलीवंदन असे कोणतेही सण साजरे केलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Santosh Deshmukh
Jayant Patil : जयंत पाटलांची ‘त्या’ विधानावर पुन्हा सारवासारव; म्हणाले, ‘आता माझी बोलायचीही चोरी झालीय, मला कुठंतरी ढकलायचंच ठरवलेलं दिसतंय’

संतोष देशमुख असते तर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. मात्र, त्यांच्या खुनापासून आमच्या गावाला सुतक पडलं आहे. तेव्हापासून आमच्या गावात कोणता कार्यक्रम झालेला नाही, कोणताही सण साजरा केलेला नाही. देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही गावात कोणताही सण साजरा करणार नाही, असेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com