Maharashtra Politic's : फडणवीस सरकार पडणार; शिंदे समर्थक आमदाराचे खळबळजनक विधान, आमदारांचे गणितही मांडले

Eknath Shinde-Ajit Pawar Alliance : महापालिका निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार पडेल, असे विधान करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.
Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 06 January : राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी आपल्या धक्कादायक वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार पडेल, असे खळबळजनक विधान करताना राजकीय समीकरणंही सांगितली आहेत, त्यामुळे आमदार खरेंच्या विधानाची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यात सध्या 29 महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोळचे आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले, तर फडणवीसांचे सरकार पडेल, असं विधान केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे‌. त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

मागील नगरपरिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. त्या वेळी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. आता महापालिकेतही अनेक ठिकाणी भाजपच्या विरोधात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे.

पुण्याच्या प्रचारात तर अजितदादा (Ajit Pawar) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही आलेबल आहे, असे दिसून येत नाही, त्यातच आमदार राजू खरे यांनी फडणवीस यांचे सरकार पडेल, असे विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis
Suresh Kalmadi : शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी 'मॅनेज दिल्ली' राबवणारे मित्र सुरेश कलमाडी; नेमका काय होता डिनर डिप्लोमिसीचा किस्सा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साठ, तर अजित पवारांकडे 42 आमदार आहेत. इतर अपक्ष सोबत आले आणि हे सगळे सरकारमधून बाहेर पडले, तर फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील का? सरकार पडले ना, असे म्हणत आमदार खरे यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

मोहोळ मतदारसंघातून राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पण राष्ट्रवादीपेक्षा राजू खरे हे शिंदेच्या शिवसेनेच्या जवळ आहेत. निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेतच होते. पण निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडून आल्यानंतर महिनाभरातच आपण नावालाच तुतारीचे आमदार आहेत, असे विधान केले होते.

Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ravindra Chavan : विलासरावांच्या मुलांनी ऐकवलं, रवींद्र चव्हाणांनाही कळालं; म्हणाले, मी चिरंजीवांची..."

दरम्यान, आमदार राजू खरे यांनी फडणवीस सरकारबद्दल जाहीर कार्यक्रमात भाष्य केल्याने अनेक राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांनी आमदारांचे गणितही मांडल्याने राज्यात नवे समीकरण उदयाला येणार का, अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com