
Pandharpur, 31 August : मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आंदोलन हे केवळ राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठीची धडपड आहे, असा गंभीर आरोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. मंत्रिमंडळातील एका तुकड्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाशी गद्दारी करू नये, असा हल्लाबोल गायकवाड यांनी चंद्रकांतदादांवर केला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे केवळ राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी चालेली धडपड आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्याला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोरदार उत्तर देण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे ( Maratha Kranti Morcha) राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी हा आरोप केला. चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळातील एका तुकड्यासाठी मराठा समजाशी गद्दारी करु नये. राजकीय आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू आहे, हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा; अन्यथा मराठा क्रांती मोर्चा त्यांना धडा शिकवेल.
शिक्षण आणि नोकरीत गोरगरीब मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यात राज्यातील समाज बांधव सहभागी झाला आहे. चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाला लागलेला कलंक आहे. केवळ मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी मराठा समाजाशी गद्दारी करु नका. तुम्हाला पाहिजे तर राजकीय आरक्षण घ्या; पण सर्वसामान्य मराठा समाजातील मुलांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या. आम्ही राजकीय आरक्षण सोडून द्यायला आजही तयार आहोत, अशी भूमिका गायकवाड यांनी मांडली.
ते म्हणाले, चंद्रकांतदादांनी देवेंद्र फडवणीस यांची दलाली करताना भान ठेवून करावी. मनोज जरांगे पाटील यांच्यावर यापुढे चुकीचे आरोप केले, तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही. तसेच, तुम्हाला मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नाही. तुम्ही समाजाशी फुंदफितुरी करु नका.
मराठा आरक्षण चवळळीचे सुनील नागणे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावर नाराजी व्यक्त केली. बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा; अन्यथा राज्य सरकारला ते परवडणारे नाही. ही गोरगरीब मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे काम चंद्रकांत पाटलांनी करू नये ;अन्यथा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशाराही नागणे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.