Marathi Classical Language Status : मराठी भाषेला अभिजात दर्जा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'उशीर झाला...'

Sharad Pawar On Marathi Classical Language Status : केंद्र सरकारच्या निर्णयाचे महत्त्व म्हणजे मराठी भाषा म्हटल्यानंतर यापूर्वी मराठी भाषेत जेजे लिखाण झाले ते लोकांच्या निदर्शनास आले नाही ते निदर्शनास येण्याचा मार्ग खुला झाला, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शरद पवार म्हणाले, 'अभिजात भाषेचा दर्जा देण्यास उशीर झाला. जरी उशीर झाला तरी निर्णय झाला. त्यासाठी मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.'

मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं प्रत्येक मराठी माणसांचे समाधान झालं. गेले अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून मागणी होती. ती महाराष्ट्र सरकारने, साहित्य संस्थांनी केली होती.

साहित्य परिषदेमध्ये, मराठी साहित्य संमलेनामध्ये ठराव करून ही मागणी केली होती. माझ्या सारख्या लोकांनी यासाठी व्यक्तिगत पातळीवर केंद्र सरकारला आग्रह केला होता, असे देखील शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
NCP Vs BJP : कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतही पवारांचा भाजपला 'जोर का झटका'; माजी आमदारानं कमळ सोडलं, तुतारीवर लढणार...?

पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे महत्त्व म्हणजे मराठी भाषा म्हटल्यानंतर यापूर्वी मराठी भाषेत जेजे लिखाण झाले ते लोकांच्या निदर्शनास आले नाही ते निदर्शनास येण्याचा मार्ग खुला झाला. अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने प्रत्येक वर्षी सरकारकडून या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसाह्य देण्याची तरतूद आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

मराठी शाळांविषयी चिंता

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र, मराठी शाळांची संख्या घटत असल्याबद्दल पत्रकरांनी शरद पवारांनी विचारले. त्यावर शरद पवार म्हणाले, मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे.

शाळांमधील मुलांची संख्या कमी होतीये. असं चालू राहिले तर शाळा बंद होतील. शिक्षकांच्या नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.शिक्षणाच्या दृष्टिने मराठी भाषेच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे. त्यावर राज्यसरकारला स्वतंत्र बसावे लागले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याचवेळी केंद्राला एक आठवण करून देत आता महाराष्ट्राचे पळवलेले उद्योगही परत आणा, मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा आणि मराठी माणसाच्या हक्काची 'गिफ्ट सिटी' मुंबईला परत द्या, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक हरणार असल्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

Sharad Pawar
Sanjay Rathod Video : पालकमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com