Satara : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी जावळी तालुक्यातील भाजप नेते अमित कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, ''जावळी भागातला ऊस गेला नाही तर चांगला भाव असलेल्या कारखान्याला ऊस घालवण्याची आमची जबाबदारी आहे. कुणाचं कुणा वाचून नडत नसतं. कुणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी काही काळजी करण्याचं कारण नाही'', असा टोला यावेळी अजित पवारांनी लागावला.
तसेच राष्ट्रवादीने एकत्र राहावं, असा सल्लाही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. जावळीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एक विचाराने राहिले तर या भागात चमत्कार होऊ शकतो.
फक्त या नेत्यांनी एकमेकांच्या पायात पाय घालू नये. तरच येथे आपल्याला यश मिळू शकते. कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही, असं सांगून अजित पवारांनी काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांचे देखील उदाहरण दिले.
(Edited By Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.