Shetti vs Kshirsagar news : शेतकऱ्यांना फसवून शेट्टींनी कारखानदारांशी युती केली; बदनामी केल्याने अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा क्षीरसागर यांचा इशारा

Raju Shetty farmers controversy News :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या टिकेनंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी इशारा दिला आहे.
rajesh kshirsagar, raju shetty
rajesh kshirsagar, raju shetty Sarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. 2019 च्या निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने माझी बदनामी करण्यासाठी हे आरोप केले गेले. पण हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले असून, हे आरोप राजू शेट्टी यांनी सिद्ध करावेत. अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या टिकेनंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी इशारा दिला आहे.

शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच असून, शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीचं माझा खटाटोप सुरू आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

rajesh kshirsagar, raju shetty
Bacchu Kadu On Eknath Shinde : 'एकनाथ शिंदेंनी पक्ष घेऊन जायला नको होतं...', बच्चू कडू पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील शिरोळ हातकलंगले तालुक्यातून 75 टक्के समर्थन शेतकरी बांधवांनी दिला असून, येणाऱ्या काळात शंभर टक्के शेतकरी बांधव शक्तिपीठ महामार्गास समर्थन देतील, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी व्यक्त केला.

rajesh kshirsagar, raju shetty
Devendra Fadnavis : ...तर पहिली कारवाई सुधीरभाऊंवरच होईल; देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत मोठे वक्तव्य

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसत असून, खोटं बोल पण रेटून बोल हीच त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. त्याचमुळे जिल्ह्यातील नागरिकांनी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे आणि येणार्‍या काळात ही महाविकास आघाडीला जनता त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल.

rajesh kshirsagar, raju shetty
BJP Politics : भाजप अजूनही लोकसभेच्या धक्क्यात; सर्वात मोठ्या राज्यात सतावतोय विरोधकांचा तो ‘फॉर्म्यूला’

सध्या राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक नाही. शेतकरी बांधवांना फसवून त्यांनी कारखानदारांशी युती केली आहे. त्यामुळे त्यांना पैशाच्या गोष्टी दिसत आहेत. त्याचमुळे शेतकरी बांधवांनी ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली हे झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. विकासाला विरोध करून शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचे काम राजू शेट्टी यांनी बंद करावे. त्यांच्या अशा दिखाऊपणामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पाठीशी राहिलेले नाहीत याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा सल्ला आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.

rajesh kshirsagar, raju shetty
BJP Poitics : भाजपची बारामतीसाठी चौफेर फिल्डिंग, पवारांना धक्का देणार! 6 पैकी 5 मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com