
Solapur, 02 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांच्या गाड्या जाळण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. त्यात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा हात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियातून केला आहे. त्याला माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. रोहित पवारांनी आपल्या आजोबांकडून शिकावं; त्यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये, असा सल्ला राऊतांनी रोहित पवारांना दिला.
राजेंद्र राऊत (Rajendra Raut) म्हणाले, बार्शीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांच्या गाडी जाळपोळ प्रकरणात विनाकारण रणवीर राऊत यांचे नाव घेतलं जाते. त्यांना विनाकारण बदनाम करण्याचे काम केले जात आहे. रोहित पवार हे त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यात राजकारण असल्याचे भासवत आहेत. पण, दुर्दैव असं की त्यांच्या आजोबांनी देशाचं, राज्याचं राजकारण केलं. ते कशा पद्धतीने माहिती घेत होते, हे त्यांनी घरातून मार्गदर्शन घ्यावं. अर्ध्या हळकुंडानं रोहित पवारांनी शहाणं होऊ नये.
रोहित पवारांनी (Rohit Pawar) चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणावर, असे बेछूट आरोप करू नयेत. प्रत्येकाचे भवितव्य असतं. एखाद्यावर आरोप करताना त्याचे काय परिणाम होणार आहेत, याचेही भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. रणवीर राऊत यांचा शांताराम जाधव यांच्या गाड्यांच्या जाळपोळ प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. ज्यांची गाडी जळाली, त्यानेही अज्ञाताने पेटवली, अशी पोलिसांत तक्रार दिली आहे, असेही राऊतांनी नमूद केले.
ते म्हणाले, गेल्या महिन्यात एका युवकाला रणवीरकडून शिवीगाळ झाली होती. त्यात एका मुलीला छेडछाड झाली होती. हे रणवीर यांना दिसले, त्यानंतर रणवीर हा मध्यस्थी करत होता, पण तो युवक संबंधित मुलीच्या अंगावर धावून जात होता. तो कार्यकर्ता एवढ्या जवळचा आहे की, त्याच्या घरातील मुलीपर्यंत लोक जात असतील त्यातून रणवीरचा राग अनावर झाला. त्यातून शिवीगाळीचा प्रकार झाला.
त्या शिवीगाळीच्या घटनेच्या महिनाभरानंतर शांताराम जाधव यांच्या गाड्या जळाल्या. त्या गाड्या कोणी जळाल्या, याचा आम्ही शोध घेत आहोत. रणवीरचं काम पाहून त्याला विधानसभेतही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप राजेंद्र राऊत यांनी केला.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरूनही चिमटे काढले. रोहित पवार यांची फडणवीसाबाबतची भाषा आता ते मुख्यमंत्री बनल्याने नम्र झाली आहे. रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला
रोहित पवार यांची त्यावेळी सत्ता येणार, अमुक होणार, तमुख होणार अशी त्यांची भाषा होती. पण आत्ता ते नांगी टाकताना दिसतात. रोहित पवार आता देवेंद्र फडणवीसांना साहेबांशिवाय बोलत नाहीत आणि त्यावेळीची त्यांची भाषा काय होती. राजकारणात चढ-उतार होत असतात आणि आम्ही तर पूर्वीपासून विरोधी पक्षात राहिलो आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे की, आम्ही जास्त वेळ विरोधी पक्षात राहिलो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.