
Sangli News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टला राज्यात मोठा विरोध आहे. तरीदेखील राज्य सरकार तो रेटण्याचा प्रयत्न करत असून शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जातोय. आता हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 1 मे पासून अन्नत्याग आंदोलनाचा एल्गार सांगलीतील शेतकऱ्यांनी केला आहे.
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमीका घेतली आहे. आता राज्य सरकारला विरोध करण्यासाठी 19 गावांतील शेतकऱ्यांनी कामगार दिवसाचे औचित्य साधले असून 1 मे पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला आहे. तसेच, राज्य सरकार हरकतीवर सुनावणी घेत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी सरकारला थेट विरोध करण्याचे ठरवले असून हरकतींवर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. तर हरकतीवर सुनावणी घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला आहे.
दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एका गटाने याबाबत शुक्रवारी (ता.11) मिरज प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर दिगंबर कांबळे यांनी, 7 मार्च 2024 रोजी घोषित झालेल्या शक्तिपीठ महामार्गबाबत राजपत्रातून शक्तिपीठ महामार्गसंदर्भात हरकती मागितल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्ह्यातून हजारो हरकती सरकारला देण्यात आल्या आहेत. पण यावर प्रांताधिकारी यांनी कोणतीही सुनावणी घेतलेली नाही. याबाबत त्यांना निवेदनही देण्यात आलं होतं. मात्र या निवेदनाकडंही प्रांताधिकारींनी लक्ष दिलेलं नाही.
आतातर सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत थेट भूसंपादन प्रक्रिया सुरू करून राजपत्रातील हरकती देण्याच्या मुद्द्यालाच हरताळ फासली आहे. तर विदर्भ, मराठवाड्याप्रमाणेच येथेही भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. यामुळेच क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दिनी 12 जिल्ह्यांतील संबंधित सर्व 27 प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आली. या निवेदनातून शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सुनावणी घेण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.
पण आता मागणी करूनही हरकतींवर तातडीने सुनावणी न घेतल्यास संयुक्त मोजणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना वावरात पाय ठेवून देणार नाही. त्यांचे कपडे काढून नांगरटीच्या रानातून ढेकळाने ताणून मारू, अशी तीव्र भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.