Rahul Gandhi: राहुल गांधींना स्वा. सावरकर बदनामी प्रकरणात न्यायालयाचा मोठा दिलासा; नाशिक कोर्टानं खटलाच केला रद्द

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कथितरित्या अवमानकारक टिप्पणी केली होती, त्यामुळं त्यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता.
Rahul Gandhi veer savarkar
Rahul Gandhi veer savarkarsarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कथित अवमानकारक टिप्पणी प्रकरणी लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी पूर्वी कनिष्ठ न्यायालयानं त्यांच्याविरोधात फौजदारी खटला सुरु करण्याचे दिलेले आदेश सत्र न्यायलायनं रद्द केला.

Rahul Gandhi veer savarkar
Prashant Kishor: बिहारच्या निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; स्वतःची सर्व संपत्ती करणार दान

नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांच्याविरुद्ध सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी नाशिक येथील दंडाधिकारी न्यायालयाने फौजदारी खटला सुरू करण्याचे आदेश दिले होते, परंतु राहुल गांधी यांच्यावतीने दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी केली. न्यायालयाने नमूद केले की, दंडाधिकारी न्यायालयाने खटला सुरू करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही आणि पुराव्यांचा तपास न करता निर्णय घेतला.

जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी या खटल्यात दंडाधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचे निरीक्षण नोंदवत, दंडाधिकारी न्यायालयाला पुन्हा प्रक्रिया तपासून पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच दंडाधिकारी न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी देखील केली नसल्याचे सांगत, खटला रद्द करण्यात आला.

Rahul Gandhi veer savarkar
नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका यामध्ये नेमका फरक काय?

प्रकरण काय?

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान, मराठवाड्यातील हिंगोली इथं आपल्या भाषणात सावरकरांविरोधात टिप्पणी केली होती. सावरकरांनी तत्कालीन ब्रिटीश सरकारची माफी मागितली आणि त्यांच्याकडून ते आर्थिक मदत घेत होते, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत नाशिकमधील देवेंद्र भुतडा आणि अॅड मनोज पिंगळे यांनी नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयात राहुल गांधींनी सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला होता.

यावर वेळोवेळी झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधींना जामीन मंजूर झाला होता. यावेळी त्यांनी आपल्याला कलम ५०० आणि ५०४ अन्वये करण्यात आलेले आरोप मान्य नसल्याचंही म्हटलं होतं. तसंच या प्रकरणात त्यांना कोर्टाकडून जामीनही मंजूर झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com