

Mumbai News : राज्यात वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार ५ डिसेंबरला सत्तेत आले होते. त्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने सीएम देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत राज्य सरकारने वर्षभरात केलेल्या विकास कामाची माहिती दिली. तर दुसरीकडे फडणवीस यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सततच्या 'दिल्ली'वारीचे रहस्य उघड केले असून सीएम फडणवीसांनी ते सारखेच दिल्लीला कशासाठी जातात याचे थेट कारणच सांगितले आहे.
राज्यात नगरपरिषदेसाठी मतदान पार पडले. मात्र, महायुतीमधील तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढल्याने भाजप. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी पडली असल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत होते. तर कोकणात महायुतीमधील भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेत मतभेद दिसून आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमात रंगल्या होत्या. त्यावर विचारलेल्या सर्व प्रश्नाला मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखेच दिल्ली का जातात ? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले, " एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे दिल्लीत असतात. त्यामुळे त्यांची नेहमीच दिल्लीत कामे असतात. त्यामुळे ते केंद्रीय मंत्री यांच्याकडे कामे घेऊन जात असतात. अजितदादा देखील दिल्लीत जातात, पण तुम्हाला ते दिसत नाहीत. शिंदे दिल्लीत माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटतात तोपर्यंत काळजीचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसामध्ये भाजप आणि शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडले. त्यामुळे काही नाराजी झाली होती. त्यावेळी आम्ही एकत्र बसलो. मी एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिलं की, "हे तुम्ही पहिल्यांदा सुरु केले. तुम्ही उल्हासनगरमध्ये आमच्या काही नेत्यांना घेतले. त्यानंतर आम्ही तुमच्या काही जणांना कल्याण-डोंबिवलीत पक्ष प्रवेश दिला. आता हे प्रकार भविष्यात होणार नाहीत, हे आम्ही निश्चित केले आहे, त्यामुळे याबाबत काळजी करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
महायुतीमधील नाराजी आणि पक्षातील फोडाफोडीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचा कोणताही विद्यमान तसेच माजी आमदार, खासदार आमच्याकडे येणार नाही आणि आमचाही त्यांच्याकडे जाणार नाही.आमच्या मित्रपक्षांसोबत आम्ही 2029 ची निवडणूक लढवणार आहोत, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत, या कपोकल्पित गोष्टींवर आम्ही वेळ घालवला तर आम्हाला कामाला कधी वेळ मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.