Sharad Pawar : मराठा-ओबीसी वादावर शरद पवार तोडगा काढणार? अधिवेशन संपताच 'त्या' लोकांशी संवाद साधणार

Sharad Pawar On Maratha OBC Reservation Dispute : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाला आहे. आपापल्या समाजाच्या विविध मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी काही महत्वाच्या नेत्यांना आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : मागील अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाला आहे. आपापल्या समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील काही महत्वाच्या नेत्यांना आपली आमच्या समाजाविषयी काय भूमिका आहे ती स्पष्ट करा अशी मागणी केली आहेत.

यात प्रामुख्याने अनेकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. याच आरक्षणाच्या प्रश्नावर आता शरद पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे. (Maratha and OBC reservation)

ज्या जिल्ह्यांत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन समाजात तेढ निर्माण झाला आहे, जिथे अस्वस्थता आहे, अशा ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधणार असल्याचं पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. आरक्षणावरील प्रश्नावर भूमिका स्पष्ट करताना शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांमध्ये अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut : 'देवेंद्र फडणवीसांनी कपट कारस्थान करून महाराष्ट्राला कलंकित केले', संजय राऊतांनी तोफ डागली

कटुता, अविश्वासाचं चित्र दिसतंय ते भयावह आहे. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. काहीही करून हे चित्र बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास, संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम करायला पाहिजे, असं पवार म्हणाले.

तसंच, सार्वजनिक जिवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी अधिक लक्ष द्यायला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने दोन वेगवेगळे गट पडले आहेत.

Sharad Pawar
Assembly Election : राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे टेन्शन; धुळ्यातील साक्री, शिरपूर मतदारसंघावर ठोकला दावा

आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतल्या आहेत. एका गटाने ओबीसींची तर एका गटाने मराठा (Maratha) आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे, अशा शब्दात त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com