
Ahmednagar News : अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधानभवनाच्या आवारात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र दिसले होते. यावेळी त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत एकमेकांशी गप्पाही मारल्याचे पाहायला मिळाले होते.
त्यानंतर मात्र, ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. आता याच विषयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर विश्वासघात केला आहे. विश्वासघाताचे राजकारण भाजपला पसंत नाही. त्यामुळे भाजप आणि ठाकरे हे भविष्यात कधी एकत्र येतील का? याबाबत शंका आहे '', असं बावनकुळे यावेळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली.
''विश्वासघाताच्या राजकारणाला भाजपमध्ये थारा नाही. आम्ही व्यक्तीगत टीका करत नाही. पण आमच्यावर टीका टिप्पणी होत असल्याने आम्ही हात किंवा तोंड बांधलेले नाही. व्यक्तीगत टीका टिप्पणी कुणासाठीच योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघाताचं राजकारण केलं. पण ते भाजपला हे पसंत नाही. त्यामुळे पुन्हा भाजप आणी ठाकरे एकत्र येतील का? यावर शंका आहे'', असं बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, विरोधकांनी विकास व्हावा यासाठी टीका केली पाहिजे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यावर आंदोलन करायाला हरकत नाही. सरकारपुढे विरोधकांनी विकासाचे वेगवेगळे विषय मांडण्याची गरज आहे. मात्र, व्यक्तीगत टीका टाळायला हवी, असंही ते यावेळी म्हणाले.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.