Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार या पक्षाकडून नागपुरातून मंडल यात्रेला सुरुवात करण्यात आली. शरद पवार यांच्या हस्ते या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं. तसंच आरक्षणाची मर्यादा ७० टक्क्यांवर नेण्याची मागणी केली.
ओबीसींना आरक्षण कसं मिळालं आणि कोण दिलं? ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली, संविधान लिहितानाच त्यांनी याची मागणी केली होती. त्यानंतर 1977 नंतर भारतीय राजकारणात मोठे बदल झाले. पुढे बिहारचे नेते कर्पुरी ठाकूर यांनी 1971 मध्ये ओबीसींसाठी 26 टक्के आरक्षण आणलं. त्यानंतर 1989 मध्ये विश्वनाथ प्रतापसिंग प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी मंडल आयोग स्विकारण्याचं मोठं काम केलं. त्यावेळी वाजपेयी, जोशी, यांनी राजीनामा दिला त्यामुळं व्हीपी सिंग यांचं सरकार अडचणीत आलं. याविरोधात भाजपच्या लोकांनी कमंडल यात्रा काढली.
त्यामुळं ओबीसी हा आमचा DNA आहे असं सांगणाऱ्याना माझा प्रश्न आहे की, ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या राजीव गोस्वामीनं स्वतःला जाळून घेतलं त्यामागं कोण होतं? भाजपचा DNA ओबीसी असेल तर आरक्षणाची मर्यादा 70 टक्क्यांवर न्या, अशी मागणीही यावेळी आव्हाड यांनी केली. बटेंगे-कटेंगे हे सगळं नाटक उलट बाटेंगे और काटेंगे हे भाजप धोरण आहे. धनगरांना आरक्षण कुठे दिले? लोकसभेत जाऊन 70 टक्के मर्यादा वाढवून घ्या, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबाजावणी करण्याच काम केलं. आजही जातीजनगणना करूच देणार नाही ही भाजपची भूमिका आहे. भाजपच्या मंत्र्यांनी 2019 मध्ये सांगितलं होतं की जाती जनगणना होणार नाही. मागील तीन वर्षापासून सत्ताधाऱ्यांचे दलाल सुप्रीम कोर्टात ओबीसींचं आरक्षण अडवायला बसले होते. ओबीसींसाठी राज्यात 72 होस्टेल सुरू केल्याचं सरकार सांगतं त्यांपैकी फक्त ५४ होस्टेल सुरू झालेत, त्यातही सीसीटीव्ही नाहीत. हिंगण्याचा होस्टेलमध्ये मुलींची छेड काढली गेली, त्यामुळं ओबीसींच्या नावानं सरकार नाटक करत आहे, असा आरोपही आव्हाडांनी केला आहे.
जातीय जनगणना करणार असल्याचं केंद्रातील भाजप सरकारनं सांगितलं पण त्याचं अजून नोटिफिकेशन काढलेलं नाही. हे नाटक फक्त बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी केलं गेलं. भाजपला जातीय जनगणना करायची नाही. भाजपचे नित्यानंद राय म्हणतात जातीय जनगणना होणार नाही. ओबीसींना फसवण्याचा काम सध्या सुरू आहे. माझ्यासारख्या ओबीसीचा पहिला आवाज महात्मा ज्योतिबा फुले होते, या संविधानानं ते अधिकार आपल्याला दिले हा आपला धर्मग्रंथ आहे हा वाचण्यासाठी आपले प्राण पणाला लावावे लागतील, अशा शब्दांत आव्हाडांनी ओबीसींच्या मुद्द्यांवर मुद्दे मांडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.