Congress : सत्ताधारी 50 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी निधी देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसचा हल्लाबोल; 'शेतकऱ्यांसाठी निधी नाही, निवडणुकीच्या तोंडावर...'

Vijay Wadettiwar on Mahayuti Govt : राज्यातील आर्थिक स्थिती हालाखीची असताना ही सत्ताधारी आमदारांवर केलेली निधीची उधळण आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदारांसाठी सरकारने तिजोरी खुली केल्याचा आरोप, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 23 Oct : महायुती सरकारने सत्ताधारी पक्षातील पहिल्यांदाच आमदार झालेल्या जवळपास 50 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे लोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा आला आहे.

त्यामुळे काही विभागांचा निधी वळवून लोकप्रिय योजनांसाठी पैसे दिले जात आहेत. अशातच सरकारने या 50 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी देण्याचा निर्णय घेतल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्यातील आर्थिक स्थिती हालाखीची असताना ही सत्ताधारी आमदारांवर केलेली निधीची उधळण आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदारांसाठी सरकारने तिजोरी खुली केल्याचा आरोप, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Wadettiwar
Karuna Munde News : गोपीनाथ मुंडेंचे खरे वारस धनंजय मुंडेच,'करूणा' शर्मांकडून नवऱ्याच्या संघर्षाचेही कौतुक!

विजय वडेट्टीवार म्हणाले, 'राज्य सरकारने विविध योजनांचे बजेट कपात सुरू केली आहे. आमदारांना निधी देखील वेळेत आणि नियमित मिळत नाही. तरीही सत्ताधारी पक्षातील नवख्या पन्नास आमदारांना प्रत्येकी पाच कोटींचा निधी दिला जात आहे. एकीकडे आदिवासी, मागासवर्गीय योजनांचा निधी वळवला जातोय, राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय आणि दुसरीकडे निवडक आमदारांना निधी दिला जातोय हे अन्यायकारक आहे.

Vijay Wadettiwar
Mahayuti ministers audit: फडणवीसांसह शिंदे, अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर; महायुतीच्या मंत्र्यांची धडधड वाढली; 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच मोठा निर्णय होणार!

सरकारकडे शेतकऱ्यांसाठी निधी नाही पण आमदारांसाठी आहे, ही दुजाभावाची वागणूक आहे. मतांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी अटी-शर्ती लावून कमी केले जात आहेत आणि सरकार निवडणुका संपल्या की ही योजना बंद करणार, असा आमचा ठाम अंदाज आहे', असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com