Raj Thackeray : '...तर यांची चौरंग केली पाहिजेत'; महाशक्तीची आठवण करत राज ठाकरे गरजले

Raj Thackeray About Badlapur Rape Case : विदर्भातील यवतमाळ दौऱ्यावर असलेले मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरसारख्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या सत्तेची मागणी केली. सत्तेत येताच पोलिसांना 48 तास देऊन महाराष्ट्र साफ करून घेणार असे म्हटले.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापुरच्या घटनेनंतर राज्यातील मुली आणि महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरेंनी राज्यातील मुली आणि महिलांच्या सुरक्षितेवरून संताप व्यक्त केला.

"महाराष्ट्रात बाईकडे आणि मुलींकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही, असा महाराष्ट्र चालवतो", असे सांगून मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर राज ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राज ठाकरे यांच्या व्यासपीठावर होता. त्याकडं पाहून, "हा माणूस पाहिजे होता. ही महाशक्ती आज पाहिजे होती. रांझ्याच्या पाटल्याचे हातपाय कापून, जसा चौरंग केला होता, तशी यांची चौरंग केली पाहिजेत", असे राज ठाकरे यांनी ठणकावले.

"राज ठाकरे (Raj Thackeray) सहज बोलत नाही. अत्यंत गांभीर्यपूर्वक सांगतो, एकदा या महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेच्या हातात द्या. एकदाच! राज्य कसं हाकललं जात, कायद्याची भीती काय असते, हे तुम्हाला दाखवून देईल. परत या महाराष्ट्रात कुणाची बाईकडे, मुलीकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही. याच पोलिस यंत्रणेला सांगणार, 48 तास देणार, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे. ते अख्खा महाराष्ट्र साफ करून ठेवतील", असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Raj Thackeray
Uddhav Thackeray CM Post : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे हे भविष्यात महाविकास आघाडीलाही सोडतील;भाजप नेत्याची भविष्यवाणी

बदलापुरातील घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिले सेनेने बाहेर काढली. तेव्हा लोकांना हा प्रकार कळाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राज ठाकरे यांच्या व्यासपीठावर होता. त्याकडं पाहून, "हा माणूस पाहिजे होता. ही महाशक्ती आज पाहिजे होती. रांझ्याच्या पाटल्याचे हातपाय कापून, जसा चौरंग केला होता, तशी यांची चौरंग केली पाहिजेत", असे राज ठाकरे यांनी ठणकावले.

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंचा मोठा निर्णय; इतर पक्षातील बंडखोरांना मनसेची उमेदवारी देणार नाही

राज ठाकरे यांची यवतमाळ इथं सभा झाली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मुली आणि महिलांच्या सुरक्षितेवर अनेक प्रश्न उपस्थित केली. "एकदा या महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेच्या हातात द्या. राज्य कसं हाकललं जात, कायद्याची भीती काय असते, हे तुम्हाला दाखवून देईल. परत या महाराष्ट्रात कुणी बाईकडे आणि मुलीकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत करणार नाही. याच पोलिस यंत्रणेला सांगणार, 48 तास देणार, मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर (Police) विश्वास आहे. अख्खा महाराष्ट्र साफ करून ठेवतील".

"सगळ्या गोष्टी माहिती असतात. कोण अंगावर घेणार, अनेक गोष्टी महाराष्ट्रात पडलेल्या आहेत. महिलांचे विषय, शेतकरी आत्महत्या करतोय, बि-बियाणांचा प्रश्न आहे, दरवर्षी तेच-तेच चालू आहे आणि आमचे सर्व लोकं गोल-गोल उत्तर देत आहेत. आत्महत्या काही थांबत नाही, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत. आपण महाराष्ट्राची जी ब्लू-प्रिंट काढली होती, त्यात या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही ही सगळी गोष्ट माझ्या हातात दिल्यास महाराष्ट्र सुधारून दाखवतो", असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com