Chandrashekhar Bawankule: मोदींच्या निवृत्तीवरुन बावनकुळे राऊतांवर बरसले! म्हणाले, 'सकाळचा भोंगा...'

Chandrashekhar Bawankule Attacks ON Sanjay Raut: वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही आणि भाजपचे अधिकृत धोरणही नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही
Chandrashekhar Bawankule Attacks ON Sanjay Raut
Chandrashekhar Bawankule Attacks ON Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News:शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींच्या वारसदारावरून नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरच्या दौरा आटोपत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे वारसदार असल्याचे सूचित करून भाजपच्या नेत्यांना बोलते केले.

यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना ‘एक्स' वरून राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे सकाळच्या भोंगा ठरवत नाही तर जनता ठरवते. ७५ वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही आणि इतिहासही नाही असे सांगून त्यांनी मोदी यांच्याच नेतृत्वात विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल, असाही दावा केला.

बावनकुळे म्हणाले, "संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना भाजप द्वेषाचा कावीळ झाला आहे. रोज वेगवेगळी विधाने करून ते केवळ राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही आणि भाजपचे अधिकृत धोरणही नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही,"

भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. मोरारजी देसाई ८३) आणि डॉ. मनमोहन सिंग वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. मात्र भाजप द्वेषाचा कावीळ झालेल्या संजय राऊत यांना हे आठवणार नाही, असाही टोला त्यांनी लगावला. भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते, असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule Attacks ON Sanjay Raut
Beed Masjid Blast Case: हिंदू-मुस्लिम एकोप्याचे अनोखे दर्शन! अर्धमसल्याने दिला संदेश; समाजकंटकांचा डाव हाणून पाडला...

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे एक्सवर म्हणाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com