
Vijay Wadettiwar News : सत्ताधारी आमदारांमध्ये पहिल्यांदा निवडणून आलेल्या 50 आमदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, सरकार हा निधी दलित, आदिवासींच्या योजनांमधून पळवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आमदार, विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
ते म्हणाले, 'आदिवासी, दलित समाज कल्याणाच्या निधी वळवला जात आहे, दुसऱ्या योजनांना दिला जात आहे. लाडक्या बहिणांनी दिला जातोय. मागासवर्गीय, आदिवासी उद्धवस्त झाला पाहिजे म्हणून मागासवर्गीयांचा निधी वळवून आपली खर्ची मजबूत करायची अन् सत्तेची पोळी शेकायचे सुरू आहे.'
पैसे नाही सांगायचे पण लाडक्याच आमदारांना निधी देऊन इतराना वाऱ्यावर सोडायचे, हा त्या फक्त लोकप्रतिनिधी नाही तर जनतेचा ही अपमान आहे. या सरकारचे धोरण हे पक्षपातीपणाचे असून सर्वागीण विकासाचे नाही हे स्पष्ट झाले, असे देखील ते म्हणाले.
राज्यातील समाजकल्याण विभाग असो की आदिवासी विभाग यांचा निधी दुसऱ्या योजनेसाठी वळवला जातो. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सरकारने सत्ताधारी ५० आमदाराना निधीची खैरात वाटली आहे, असे देखील ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.