Mumabi APMC : मोदी-फडणवीसांच्या निर्णयानं शिंदेंची सत्ता खालसा; अजितदादांनीही लावला हातभार!

Mumbai APMC : राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
Mumbai APMC
Mumbai APMCSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्याने 17 मार्च रोजी होणारी संचालक मंडळाची बैठक पहिली आणि अखेरची होण्याची चर्चा बाजार समितीसह पणन विभागात रंगली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाशी संबंधित सर्वांत मोठे आर्थिक सत्ता केंद्र आहे. या बाजार समितीवर कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. पण माजी सभापती अशोक डक यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय वजन वापरून त्यांचे समर्थक प्रभू पाटील यांची सभापतीपदी वर्णी लावली.

Mumbai APMC
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार, पाहा खास फोटो

मात्र केंद्र आणि राज्य सरकारने बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्याने हे सभापती पद औट घटकेचे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई बाजार समिती आवारात आंतरराष्ट्रीय फळे भाजीपाला बाजार उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यात संचालक मंडळाच्या कायदेशीर अडचणी येऊ नयेत, यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ स्थापन करण्याची कायदेशीर तरतूद राष्ट्रीय बाजार संकल्पनेत आहे. यामुळे प्रभू पाटील यांचे सभापती पद औट घटकेचे राहण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या बाजार घटक, सहकार, पणन विभागात सुरू आहे.

Mumbai APMC
Eknath Shinde : '..त्यांनी सरकारच्या विकासाच्या रंगात सहभागी व्हावं', शिंदेंचं विरोधकांना आवाहन

ज्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या एकूण आवकेच्या 30 ते 40 टक्के शेतमाल दोन किंवा अधिक राज्यांतून येत असेल अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देऊन, त्या बाजार समित्या निवडणुकांच्या प्रक्रियेतून वगळण्याची प्रमुख तरतूद आहे. यानुसार मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळू शकतो. यामुळे सहकाराशी निगडित प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची ‘सोय’ , पुनर्वसन आता होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com