Eknath Shinde : "शिंदे अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला का गेले, तिकडे कोणती देवी...?" राऊतांना वेगळीच शंका, नेमकं काय म्हणाले?

Mahayuti Government Formation News :काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापन करण्यात आपला कोणताही अडथळा येणार नसल्याचं वक्तव्य करणारे एकनाथ शिंदे पुन्हा नाराज झाले आहेत. नाराज मुख्यमंत्र्यांनी थेट साताऱ्यातील आपलं दरे गाव गाठलं आहे. मात्र, शिंदेंनी आपल्या गावी जाताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

CM Eknath Shinde News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही अजून महायुतीच्या (Mahayuti) सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. आधी मुख्यमंत्रिपदावरून रखडलेला शपथविधी आता गृहमंत्रिपदामुळे रखडल्याचं समोर आलं आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडून मागील सरकारमध्ये भाजपकडे असलेल्या गृहमंत्रिपदावर दावा केल्यामुळे युतीत नवा वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापन करण्यात आपला कोणताही अडथळा येणार नसल्याचं वक्तव्य करणारे एकनाथ शिंदे पुन्हा नाराज झाले आहेत.

नाराज मुख्यमंत्र्यांनी थेट साताऱ्यातील आपलं दरे गाव गाठलं आहे. मात्र, शिंदेंनी आपल्या गावी जाताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे अमावस्येच्या मुहूर्तावरच आपल्या गावी का गेले? अशी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, निकाल लागून आठ दिवस झाले तरीही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.

Eknath Shinde
Mahayuti Politics : एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण काय? भरत गोगावलेंच्या बोलण्यातून झालं स्पष्ट

निकाल लागला त्याबद्दल लोकांच्या मनात संशय आहे. एवढं बहुमत मिळालं तरीही कुठेही खुशीचं वातावरण नाही. स्वत: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन आपल्या साताऱ्यातील गावी गेले आहेत. एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर आपल्या गावी का गेले आहेत? या अमावस्येचं काय महत्व आहे मला कळत नाही. त्यांच्या गावत अशी कोणती देवी आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार आहेत बोललं जात आहे. ते कधी मुख्यमंत्री होतायत याची आम्ही वाट बघतोय का आणखी कोणाचं नाव येणार मला माहिती नाही, अशी गुगली देखील राऊतांनी यावेळी टाकली. तर या निकालावर देशभरात संशय व्यक्त केला जात असून 76 लाख मते वाढली कशी या मतांचं काय झालं? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात असल्याचं राऊत म्हणाले.

Eknath Shinde
Sharad Pawar : EVM मध्ये घोळ अन् 15 टक्के मतं सेट? मतमोजणी प्रक्रियेवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "शेवटच्या 2 तासांत..."

राजकीय पेच निर्माण झाला की मुख्यमंत्री गावी जातात

तर शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार संजय शिरसाट यांनी शिंदे मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. शिरसाट म्हणाले, "राजकीय पेच प्रचंग येतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो. त्यावेळी ते आपल्या गावी जातात. त्यांच्या गावात फोन लागत नाही. तेथे रेंज नाही. उद्या संध्याकाळ पर्यंत ते आपला निर्णय घेतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com