Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण थांबवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील ९ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज थांबवले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केल्यानंतर, जरांगे पाटील यांनी सरकारला काही अटींसह दोन महिन्यांची म्हणजेच २ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खरंतर मनोज जरांगे पाटील यांनी काल आणि परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विधान करत, आपला राग जाहीरपणे व्यक्त केला होता. त्यामुळे मराठा समाजात फडणीसांबाबत रोष निर्माण होत होता. अखेर सरकारपातळीवर दोन दिवसांमधील जलद घडामोडींनंतर आज मंत्र्यांचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीस गेले होते आणि जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्यात त्यांना यश आले.
यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''मराठा आरक्षणासाठी गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार !''
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? -
''मनोज जरांगे पाटील यांनी आज त्यांचे उपोषण मागे घेतलं आहे. याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो. याचबरोबर सकल मराठा समजाने शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन, हे उपोषण, आंदोलन मागे घेतल्याबद्दल मराठा समाजाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो.''
''मी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठवरलं. शेवटी चर्चा आणि संवादातून कुठलाही प्रश्न सुटू शकतो. चर्चा करण्याची जेव्हा दोन्ही बाजूंची तयारी असते त्यावेळी चर्चेतून मार्ग निघतो. म्हणून सरकारने ठरवलं आणि त्याप्रमाणे कायदेतज्ज्ञ आणि मंत्री देखील गेले.
मला वाटतं ही इतिहासातील पहिली घटना असेल, की कायदेतज्ज्ञ एका उपोषणस्थळी आंदोलकांशी बोलण्यासाठी जातात. न्यायमूर्ती गायकवाड यांनी याबाबत संपूर्ण माहिती होती. त्यामुळे आज ही सर्व चर्चा झाल्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समितीने केलेल्या कामावर मनोज जरांगे यांची खात्री पटली. '' असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.