
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांच्या प्रकृती हळूहळू खालवत आहे. मात्र, ओबीसमधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच उद्यापासून आणखी कडक उपोषण करणार पाणी देखील घेणार नाही, असे सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील जरांगे यांनी टीका केली. ते म्हणाले, 'त्याला काही अक्कल नाही म्हणून त्याला काढून टाकलं आहे. चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागलाय. त्याला आता मी निटोबा केला असता. त्याच्या एका शब्दामुळे त्याला महाराष्ट्रात सोडा, दिल्लीत राहण्याचीही पंचायत होईल. त्याचा गेमच वाजवील.'
'तुम्हाला काय करायचे ते करा पण ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडत नसतात. याच्या पुढच सांगतो शनिवारी रविवारी महाराष्ट्रातील मराठा घरी नसतो. आम्ही फक्त इकडून सांगितलं शनिवारी या तर मुंबई सोडा इथेन मागे 100 ते 200 मीटर मागे उभं राहावं लागेल.', असे देखील जरांगे पाटील म्हणाले.
मराठा उपसमितीची बैठक आज पार पाडली. समितीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीनंतर सांगितले की आम्ही मागण्यांचा विचार करतो त्यासाठी अॅडव्होकेट जनरलसाहेबांची वेळ मागितली आहे. ते आज संध्याकाळी पाच वाजता भेटणार आहेत. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री आणि दहा वर्ष केंद्रात मंत्री होते त्यामुळे त्यांना कळलं नाही का मराठा आरक्षण द्यावे, असा प्रश्न देखील त्यांनी पत्रकारांच्या शरद पवारांच्या तामिळनाडूच्या धर्तीवर 72 टक्के आरक्षण देण्याच्या वक्तव्यावर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.