Sharad Pawar And PULOD : 'पुलोद'चा प्रयोग बरोबरच, तर...; शरद पवारांनी ठणकावलं

Ajit Pawar Vs Sharad Pawar : नागालँड राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही केली स्पष्ट
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra NCP Crisis News : राज्यात रविवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी इतर आठ जणांसह राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. भाजपसोबत गेल्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावर अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजकारणाचा इतिहासच सांगितला. शरद पवार यांनी केलेल्या पुलोदच्या प्रयोगावरही त्यांनी बोट ठेवले. तसेच त्यांनी केलेले सर्व चालते तर आम्ही केले तर नको वाटते, असाही घणाघात यावेळी शरद पवार यांच्यावर केला.

यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाने केलेल्या सर्व आरोप खोडण्याचा प्रयत्न केला. तसेच पुलोद सरकार स्थापनेचा निर्णय योग्यच होता, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले. तसेच नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा देण्याची पार्श्वभूमीही स्पष्ट पवार यांनी यावेळी स्पष्ट केली. (Latest Political News)

Sharad Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांवरील टिपण्णीवरून पवारांकडून अजितदादांची कोंडी ; म्हणाले "आता 'असल्या'..."

'पुलोद'बाबत पवार म्हणाले की, "राज्यात सध्या फुटीरांचे पेव आले आहे. यासाठी ते 'पुलोद' सरकारचा दाखल देत आहेत. या फुटीरांमध्ये आणि 'पुलोद'मध्ये फरक आहे. आणीबाणीनंतर काँग्रेसच्या नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी मला 'पुलोद'साठी नेतृत्व करण्याची विनंती केली होती. त्यावेळी जनता पक्ष होता. भाजप नव्हता. सध्याचा भाजप देशाच्या ऐक्याला सुरूंग लावण्याचे काम करत आहे. देशात सर्वात मोठा असूनही जनता पक्षाची भूमिका सहिष्णुवादी होता. राज्याच्या हिताच्या दृष्टीने तो निर्णय योग्यच होता. "

यानंतर आपण नागालँडमध्ये भाजपसोबत का गेलो याबाबतही त्यांनी माहिती दिली. पवार म्हणाले, "नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत. राज्याराज्यातील राजकीय बारकावे लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. त्यामुले बाहेरून पाठिंबा दिला. नागालँड, मणीपूर ही राज्ये चीनच्या सीमा भागात आहेत. तेथील प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नागालँडचे उादाहरण योग्य नाही."

Sharad Pawar
Shiv Sena News : 'शिवसेनेचे बंडखोर ठाकरेंकडे परत जातील'; भाजपा खासदाराच्या दाव्याने पुन्हा खळबळ

शरद पवार यांनी अजित पवारांना घेरण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले, "राज्याच्या ऐक्याला सुरूंग लावण्याची भाषा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. आज आपल्या पक्षातील काही नेते त्यांच्याबरोबर गेले आहेत. त्यामुळे मनात अस्वस्थता आहे. मागील काही दिवसांपूर्वीचे त्यांचे भाषण ऐकले. त्यात त्यांनी म्हटले होते की राज्याच्या इतिहासात 'असला' मुख्यमंत्री झाला नाही. आता ते 'असल्या' मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करणार आहेत."

Edited by Sunil Dhumal

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com