NCP Mla Disqualification case : सुनावणीआधी जयंत पाटील यांची वकिलांसोबत तयारी

Jayant patil : जयंत पाटील यांची साक्ष महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडून विशेष तयारी केली जात असल्याचे निदर्शनास आले.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीचा आजचा (बुधवार) दुसरा दिवस आहे. मंगळवारी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि हेमंत टकले यांची साक्ष पार पडली. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची साक्ष होणार आहे. सुनावणीपूर्वी जयंत पाटील वकिलांसोबत चर्चा करताना दिसून आले.

प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील (Jayant patil) यांची साक्ष महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडून विशेष तयारी केली जात असल्याचे निदर्शनास आले. सभागृहात येण्याआधी ते वकिलांच्या गाडीतून प्रवास करताना आढळले, तसेच सभागृहातदेखील साक्ष देण्याआधी ते वकिलांशी चर्चा करीत होते. उलटतपासणीवेळी नेमके कोणते प्रश्न विचारले जातील, या सगळ्यांचाी चर्चा ते वकिलांशी करीत असल्याची शक्यता आहे.

Jayant Patil
NCP Mla Disqualification Case : जितेंद्र आव्हाडांची साक्ष अन् त्यांच्याच वकिलांनी मारला कपाळावर हात

अमोल कोल्हे यांची आज साक्ष

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचीदेखील आज (बुधवारी) साक्ष होणार आहे. अमोल कोल्हे यांचीदेखील साक्ष महत्त्वाची मानली जात आहे. ज्यावेळी अजित पवार यांनी राजभवनात शपथ घेतली होती त्यावेळी अमोल कोल्हे तेथे उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. कायम साहेबांसोबत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रतिज्ञापत्रदेखील त्यांनी शरद पवारांच्या बाजूने दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाचे महत्त्वाची कागदपत्रे गहाळ

आमदार जितेंद्र आव्हाड यांची मंगळवारी साक्ष झाली. "पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्यासंदर्भातील कागदपत्रे ज्या कपाटात ठेवण्यात आली होती. त्याची जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ती कागदपत्रे गहाळ केली. संबंधित माणसं पक्ष सोडून गेली आहेत. त्यांनी या कागदपत्र म्हणजे पुराव्यांचे काय केले माहिती नाही," असं आव्हाड यांनी आपल्या साक्षीत म्हटले होते.

पत्र लिहिण्याचा अधिकार अध्यक्षांना

निवडणुकीची कागदपत्रे गहाळ झाल्यावर त्याची जबाबदारी असणाऱ्यांना पत्र लिहिले होते का? असा प्रश्न आव्हाडांना विचारण्यात आला होता. त्यावेळी कोणतेच पत्र मी लिहिलेले नाही, असे उत्तर दिले. तसेच पत्र लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे? असे विचारले असता आव्हाडांनी माझ्या माहितीनुसार असे पत्र लिहिण्याचा अधिकार पक्षाचे राज्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारी सचिव, राष्ट्रीय अध्यक्ष यांना आहे असे उत्तर दिले.

(Edited By Roshan More)

R...

Jayant Patil
Maharashtra-Madhya Pradesh : महाराष्ट्र-मध्यप्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यासाठी गडकरींनी दिले ‘हे’ आश्‍वासन !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com