
Mumbai News, 01 Mar : "उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त केलं नाही तर माझं नाव सांगणार नाही", अशी शपथच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. कमद यांनी आपल्या मुलाला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता. मात्र, आता मीच त्यांना उद्ध्वस्त करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
शुक्रवारी (ता.28) दापोलीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या याच वक्तव्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "दिल्लीच्या मोघलाईबरोबर हात मिळवणी करून महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले जी शक्ती आहे. त्यांना रोखण्याची आणि संपवण्याची ताकद ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे. हे तुमचं फडफडणं तात्पुरतं आहे. सत्तेमुळेच तुमचे फडफडणं आहे.
एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या आणि शिवसेना भवनाच्या दारात यावं लागेल, हे माझं भाकीत नव्हे तर दावा आहे." अशा शब्दात त्यांनी कदमांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. तसंच यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रीपदावरही भाष्य केलं.
ते म्हणाले, कोकाटे हे कायद्याने अपात्र ठरले आहेत. मात्र, मंत्रीपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पण नियम आणि कायदा पाहिला तर 24 तासात सुनील केदारांची आमदारकी गेली होती. मात्र, कोकाटेंच्या प्रकरणात स्वतःचा बचाव करण्यासाठी संधी दिली जात असली तरीही आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.