ShivSenaUBT Party : बोगस मतदान रोखा, शिवसेनायुबीटी पक्षाने सुचवला 'मोठा' पर्याय

ShivSenaUBT Party Central Election Commission voting card Aadhaar card voting : निवडणुका निष्पक्ष आणि बोगर मतदानाला रोखण्यासाठी शिवसेनायुबीटी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.
Voter List News
Voter List NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : निवडणुकांमधील बोगस मतदान रोखण्यासाठी, मतदारयाद्या बोगस मतदार घुसवण्याचे प्रकार थांबवण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पत्र देत बोगस मतदान रोखण्याची मागणी केली. यासाठी पूर्वी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने काही उपाययोजना करण्याचे धोरण स्वीकारले होते, त्याकडे खासदार देसाई यांनी लक्ष वेधले.

Voter List News
Mahayuti Government Account Allocation : अजितदादांना 'अर्थ' दिले, मग आम्हाला 'गृह' का नाही? महायुतीमधील तिढ्यामुळे खातेवाटप लांबणीवर

मतदार ओळखपत्राला आधार कार्डाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली होती. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. ती का होऊ शकली नाही, हे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगालाच (Election Commission) माहिती. पण निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही सूचना विचारात घेऊन भविष्यातील निवडणुकांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी खासदार देसाई यांनी पत्राद्वारे केली.

Voter List News
Top 10 News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांच्या विरोधात तक्रार - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

आयोगाच्यावतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारयादीत नाव असलेल्या व्यक्तींची पडताळणी करून मतदारयाद्यांच्या पुनर्परीक्षणाची प्रक्रिया पार पाडतात. मतदारयादी अद्ययावत करणे आणि नीट पडताळणी करून

तफावतींकडे 'बीएलओं'चे दुर्लक्ष

प्रसिद्ध करणे हे 'बीएलओ'चे काम असते. 'बीएलओ'सोबत समन्वय साधून मतदारयादीत नावे समाविष्ट करणे आणि वगळण्याच्या कामात राजकीय पक्षांच्या मतदानकेंद्र प्रतिनिधींचाही सहभाग असतो. पण बूथ प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिलेल्या तफावतींकडे 'बीएलओ' दुर्लक्ष करीत असल्याचे अनेकदा दिसून येते याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लक्ष वेधले.

अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत नाही

मतदारयाद्यांमध्ये हजारो नावे वगळण्यात येतात आणि हजारो नावांची पडताळणीशिवाय भर घातली जाते. राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाते, असे नाही. समाधानकारक उत्तरे दिली जात नाही आणि दुरुस्त्या करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत, असा दावा खासदार देसाई यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्राला आधार कार्डाशी जोडल्यास निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष होईल, असे पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com