Sanjay Jadhav : शिंदेंच्या स्नेहभोजनाला गेलेले ठाकरेंचे खासदार जाधव पत्रकारांवरच घसरले; म्हणाले, ‘ए चल, फालतू सांगू नको’ (Video)

Eknath Shinde's Dinner Diplomacy : जेवणाला कोणी निमंत्रण दिलं तर तुम्ही जात नाही का? फालतू गोष्टी करता. तुम्हाला दुसरं कोणी जेवायला बोलावले तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना विचारून जेवायला जाता का? असा सवाल खासदार संजय जाधव यांनी केला.
Sanjay Jadhav-Nagesh Patil Ashtikar
Sanjay Jadhav-Nagesh Patil AshtikarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 13 February : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावली होती. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच शिंदेंच्या स्नेहभोजनाला गेलेले ठाकरे गटाचे खासदार संजय (बंडू) जाधव यांना त्याबाबत विचारणा केली असता, ते पत्रकारांवरच संतापले. ‘तुम्हाला कोणी जेवायला बोलावले, तर तुम्ही जात नाही का,’ अशी उलटतपासणीच त्यांनी घेतली. शिवाय ऑपरेशन टायगर फेल आहे, असेही सांगितले.

जेवणाला कोणी निमंत्रण दिलं तर तुम्ही जात नाही का? फालतू गोष्टी करता. तुम्हाला दुसरं कोणी जेवायला बोलावले तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना विचारून जेवायला जाता का? असा सवाल खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला. पत्रकारांनी त्यांना ‘आम्ही तुम्हाला पक्षासंदर्भात बोलतो आहे,’ असे विचारताच ‘मी फुटलेलो नाही ना.’ असे उत्तर जाधवांनी दिले

पुढे पत्रकारांनी त्यांना ज्यांनी ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडला त्यांच्या जेवणाला कसे जाता, असे विचारताच ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव संतापले आणि म्हणाले, ‘ए चल, बाकी सांगू नको. चल, फालतू सांगू नको,’ असे त्यांनी पत्रकारांनाच सुनावले.

Sanjay Jadhav-Nagesh Patil Ashtikar
Maharashtra Politic's : ठाकरेंना गल्लीपासून दिल्लीपर्यंत धक्क्यांवर धक्के; शिंदेंच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या तीन खासदारांची हजेरी

तुम्ही आता आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत का, यावरही संजय जाधव यांनी संतापूनच अरे माझ्या पक्षाचे नेते आहे. मी भेटणार का म्हणजे काय उधारी आहे का? काय विचारावं हे तुम्हीपण ठरवलं पाहिजे राव. त्यावर पत्रकारांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या संदर्भात पुन्हा विचारणा केली असता ‘ए टायगर फियगर फेल आहे, चल...सपशेल फेल आहे’

Sanjay Jadhav-Nagesh Patil Ashtikar
Aaditya Thackeray : "स्वत:च्या स्वार्थासाठी..."; उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींवर आदित्य ठाकरे बरसले

नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितले स्नेहभोजनाला जाण्याचे कारण...

प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयाचे उद्‌घाटन होते. महाराष्ट्रातील सर्वच खासदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण देण्यात आले होते. सायंकाळी वेळ होता, त्यामुळे आम्ही स्नेहभोजनाला गेलो होते. आम्ही फुटणार, हे सर्व खोटे आहे. असं काही होणे नाही. आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे, त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. प्रताप जाधव हे मंत्री आहेत, त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ ही अफवा आहे, आमच्या संपर्कात कोणीही नाही आणि आम्हीसुद्धा कोणाच्या संपर्कात नाही, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com