
Uddhav Thackeray : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं, त्यातून केवळ सत्ताधाऱ्यांच्या पाशवी बहुमताचा माज दिसला. अधिवेशन काळात देशाला, राज्याला चांगलं गाणं मिळालं. तेवढच काय ते अधिवेशनाचं फलित म्हणावं लागेल अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज( ता. २७) पत्रकारपरिषद घेत सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. अर्थसंकल्पीय अधिवेशन हताशा, निराशावादी स्वरुपाचे होते. अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. जयंत पाटील म्हणाले अगदी तसंच कबरीपासून कामरापर्यंत हे अधिवेशन राहिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
अधिवेशनातून सत्ताधाऱ्यांचा केवळ माज दिसला. या पूर्वी कधीही विरोधी पक्षाने राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात हे सांगितलं असं कधी घडलं नाही. गेल्या अनेक वर्षात सभापतीवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला. असही कधी झालं नाही असही उद्धव ठाकरे म्हणाले.
ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. भाजपने आता हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन ३२ लाख भाजपचे कार्यकर्ते भेट देणार आहे. हा सौगात ए मोदी नाही. हा निर्लज्जपणा आहे. सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मुस्लिमांनी आम्हाला मोठ्या संख्येने मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले होते. मुस्लिमांनी मते दिली म्हणून यांनी त्याला सत्ता जिहाद म्हटलं होतं. आता हेच ईद निमित्त सौगात हे मोदी कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे यांनी आता हिंदुत्व सोडलं असं जाहीर करुन टाकावं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.