
Navi Delhi News, 23 Feb : ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सध्या नवी दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. या साहित्य संमेलनातील 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, "कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. २०१२ ते २०१४ पर्यंतचे शेवटचे शिवाजी पार्कवरील सगळ्या कार्यक्रमाची तयारी त्यांचेच (एकनाथ शिंदे) लोक करायचे. प्रत्येक सभेला ठाण्यातून लोकं यायची आणि तेच सगळी तयारी करायचे. पण मुळात संपर्कच नको असेल नेत्यांना तर तिथे आपण काय करू शकतो?"
यावर 'नव्या मॅनेजरचा गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता का?' असं विचारताच त्या म्हणाल्या त्यांच्यावर ते ढकललं जात होतं. (ठाकरेंच्या शिवसेनेत) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायचं, नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो.", असं म्हणत गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केला.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. "ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे"; असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी गोऱ्हेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. पक्षाने माझ्याकडे कधीही पैसे मागितले नाहीत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.