Rahul Gandhi: काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबाशी राहुल गांधींचा 'दिल से' संवाद; नाशिकमधील मेळाव्यात भारावले नातेवाईक

Rahul Gandhi: वैयक्तिकरित्या कुटुंबियांशी संवाद साधताना राहुल गांधींनी दिला महत्वाचा संदेश
Rahul Gandhi FIR | SC-ST Act Case | Haldwani
Rahul Gandhi FIR | SC-ST Act Case | HaldwaniSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi: गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये राज्यातील काँग्रेस पक्षाच्या 78 जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचं शिबीर सुरू होतं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप झाला. यावेळी राहुल गांधींनी सुमारे दोन तास पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मनोभूमिका समजून घेतली. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यामुळे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे कुटुंबियांचाच हा मेळावा ठरला. यावेळी राहुल गांधींनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची आस्थेनं विचारपूस केली. त्यामुळं ते देखील भारावले होते. The family was overwhelmed by Rahul Gandhi interaction their wish to meet was fulfilled for the first time

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना काय संदेश द्याल? अशी विचारणा कुटुंबीयांनी केली. त्यावर काँग्रेस हे कुटुंब आहे, एकमेकांच्या सुख-दुःखात आस्थेने सहभागी होत चला, असं यावेळी गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाला समाजातील द्वेष आणि घृणा संपुष्टात आणायची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे. त्याची सत्ताधारी आणि राजकीय मंडळी समाजात द्वेष पसरविण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहे. त्याला उत्तर दिलं पाहिजे.

Rahul Gandhi FIR | SC-ST Act Case | Haldwani
Rahul Gandhi : काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणानंतर शुद्धीकरण, राहुल गांधींचा भाजपवर 'सर्जिकल स्ट्राइक'; PM मोदींकडे एफआयआरची मागणी!

काँग्रेस पक्षाने प्रदीर्घकाळ देश आणि समाज उभारणीसाठी योगदान दिले आहे. प्रेम आणि आपुलकी हाच काँग्रेसचा संदेश आहे. समाजातील आणि धर्मातील वाद संपुष्टात आले पाहिजे. देशाच्या विकासातूनच युवक आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला पुढे जाण्याची आणि विकासाची संधी मिळणार आहे.

Rahul Gandhi FIR | SC-ST Act Case | Haldwani
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी 'पंतप्रधान शिष्यवृत्ती'; अर्ज कसा करणार? नियम काय? जाणून घ्या

आगामी काळात काँग्रेस पक्ष समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलेसे करण्यासाठी परिश्रम घेणार आहे. यासंदर्भात निवडणूक एवढेच लक्ष्य न ठेवता सातत्याने देशाच्या हिताचे काम करीत राहिले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांसह राज्यातील विविध वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com