
Tanaji Sawant News :माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरातून आपल्या गाडीतून जात असताना सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही अपहरणाची घटना घडल्याची सांगितले जात आहे.
गाडीतून जात असताना काही लोकांना तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण केल्याची सांगितले जात आहे. या प्रकरणात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना झाले आहे. ज्या मार्गावरून सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहे.
'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा तीन मित्रांसोबत पुणे विमानतळावर गेला होता. त्याच्यासोबत तीन मित्र देखील होते. मात्र, नंतर त्याचा फोन बंद लागला. पुणे पोलिस कंट्रोल रुमला फोन त्याचा अपहरणाचा फोन आला. मात्र, ऋषिराज हा विमानतळातून बाहेर पडताना दिसला नाही.
ऋषिराज याने ड्रायव्हर फोन करून विमानतळावरून जाण्यास सांगितले. त्यामुळे ऋषिराज याचे अपहर झाले की तो बेपत्ता आहे याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांचे पथक तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज परिसरातील निवासस्थानी देखील गेले आहे. निवासस्थानी कुणाचे फोन किंवा खंडणी मागण्यात आली होती का याची माहिती पोलिस घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.