Loksabha Election News : राष्ट्रवादीच्या नेत्याने मांडले गणित; 'महाविकास'ला 38 जागा, तर शरद पवार पक्षाचा आठ ठिकाणी विजय

Amol Kolhe अमोल कोल्हे म्हणाले, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार ही काळा दगडावरची पांढरी रेग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किमान आठ जागा जिंकून येतील अशी सध्याची परिस्थिती आहे.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhesarkarnama

Pune News : शिरूर लोकसभेचे मतदान 13 मे ला झाले तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलेल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच देशभरामध्ये इंडिया आघाडीचे सरकार येणार असून महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी 35 ते 38 जागांवर विजय मिळवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागांवर विजय होईल, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडल्यानंतर अमोल कोल्हे हे पाचव्या टप्प्यात मधील महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा प्रचार करत आहे. नुकताच त्यांनी नाशिक मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. या दरम्यान त्यांनी वेळ काढत शिरूरमध्ये येत निवडणुकीमध्ये मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये कोल्हे म्हणाले, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार ही काळा दगडावरची पांढरी रेग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाराष्ट्रात दहा जागा लढवत असून त्यातील किमान आठ जागा जिंकून येतील अशी सध्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विचार केला तर सुरुवातीच्या काळात आम्ही 30 ते 35 जागा जिंकू असं म्हणत होतो.

Dr. Amol Kolhe
Shirur Lok Sabha Vishelshan : आढळरावांच्या विजयाची भिस्त ‘आंबेगाव’वर; कोल्हेंना जुन्नर हात देणार का?

मात्र सध्या 35 ते 38 जागा जिंकू असा विश्वास आम्हाला वाटत आहे. दिंडोरीची भास्कर भगरे यांची जागा शंभर टक्के निवडून येणार हे स्पष्ट दिसत आहे. माढा, सातारा, नगर आणि बारामती तर शंभर टक्के आपण जिंकणार आहोत. तसेच विधानसभेमध्ये देखील महाविकास आघाडीचे सरकारच येणार असल्याचा विश्वास देखील कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच विधानसभा निवडणुकीबाबतचा कार्यक्रम तयार करण्यात येत असून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा जिंकण्यासाठी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे असं कोल्हे म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

Dr. Amol Kolhe
Amol Kolhe News : मतदान संपताच शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com