Uday Samant Vs Sanjay Raut : 'राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री संजय राऊत होणार...', एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितले

Uday Samant Criticized Sanjay Raut : सामंत पुढे म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःच्या पक्षप्रवेशाबाबतचा प्रस्ताव आणला होता. मात्र त्यावेळी मी त्यांच्यासाठी अडकाठी बनलो.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असून तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतीलच असणार आहे. यासाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहेत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे वक्तव्य करून त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. यानंतर उदय सामंत यांनी देखील या वक्तव्याला प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उदय सामंत म्हणाले, संजय राऊत हे आमच्या सोबत महायुतीमध्ये येत आहेत का ? आणि त्यांची उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का? याबाबत मला माहिती नाही. आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावर केलेली टीका ही असूया , जळफळाट आहे. मात्र, याचा राज्यातील उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होतो याकडे विरोधक डोळे झाक करत आहेत.

Sanjay Raut
Suresh Dhas On Beed Police : बीडच्या पोलिसांवर 'आका'चा दबाव ?, प्रॉपर्टी जप्त करा; धस कडाडले

सामंत पुढे म्हणाले, माझी बदनामी करण्याची सुरुवात विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःच्या पक्षप्रवेशाबाबतचा प्रस्ताव आणला होता. मात्र त्यावेळी मी त्यांच्यासाठी अडकाठी बनलो, असे कदाचित त्यांना वाटत असेल त्यामुळे त्यांनी माझी बदनामी करणे सुरू केले असावे. मात्र माझ्या नावाचा वापर करून ज्यांचा अस्त झाला आहे त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये, असा टोलाही सामंत यांनी लगवाला.

दावोस इथे मुकेश अंबानी कंपनीने महाराष्ट्रात तीन लाख पाच हजार कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम उद्योगासाठी पोषक वातावरण यामुळे ते गुंतवणूक करत असल्याचं सामंत यांनी म्हटले . तसेच ठाकरेंनी अंबानी यांच्या विमानाने फिरण्यापेक्षा अंबानी यांच्यावर टीका करून दाखवावी, असे आव्हान उदय सामंत यांनी दिले.

मराठी विश्व संमेलन पुण्यात

यंदा मराठी विश्व संमेलन पुण्यात घ्यायचं निश्चित केलं आहे. 31 तारखेला सकाळी बालगंधर्व ते फर्ग्युसन शोभ यात्रेने या संमेलनाला सुरुवात होईल. तीन दिवस हे संमेलन असणार असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहतील. यावेळी साहित्य पुरस्कार देण्याच निश्चित करण्यात आला आहे. मधू मंगेश कर्णिक यांना पुरस्कार देण्यात येणार आहे, असे देखील सामंत यांनी सांगितले.

Sanjay Raut
Mahayuti Government : सत्तेत येऊन सरकारला महिना उलटला; सत्ताधारी कामाला लागेनात तर विरोधकांना सूर सापडेना ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com