Raj Thackeray :'...तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका', राज ठाकरेंचे मंत्री उदय सामंतांना आवाहन

Raj Thackeray Uday Samant : माणसाचे अस्तित्व हे जमीनवर असते. आमचा इतिहास म्हणता पण इतिहास म्हणजे भूगोल. हा प्रदेश, जमीन पायाखालून सरकली तर तुमचे अस्तित्व राहत नाही. मराठी माणसांचे अस्तित्व असायला हवे ते आपण टीकावायला हवे, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News: मराठी विश्व साहित्य संमेलनात आज (रविवारी) राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या मराठी विश्व साहित्य संमेलनात मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेसाठी राज ठाकरे ज्या गोष्टी सांगिती त्या गोष्टींना मदत करू, असे आश्वासन दिले.

सामंत यांच्या भाषणानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले 'उदयजी आपण मदत करालच. पण आम्ही जे जे करू त्याला देखील आपण पाठींबा द्यावा, अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आत्तापर्यंतच अनुभव सांगितला बाकी काही नाही. जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय मराठी भाषेसाठी करतोय. आमच्या आमच्या परीने करतोय.'

Raj Thackeray
Awadhesh Prasad News : तरुणीचे डोळे फोडले, निर्घृण हत्या..! मीडियासमोर खासदार हमसून हमसून रडले, पाहा Video

'माणसाचे अस्तित्व हे जमीनवर असते. आमचा इतिहास म्हणता पण इतिहास म्हणजे भूगोल. हा प्रदेश, जमीन पायाखालून सरकली तर तुमचे अस्तित्व राहत नाही. मराठी माणसांचे अस्तित्व असायला हवे ते आपण टीकावायला हवे, प्रगतीच्या नावावर जमीनी जात असतील तर तो विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो डाव असतो.इतिहासामधून बोध घेणार नसू तर इतिहास न वाचलेला बरा.', असे देखील राज ठाकरे म्हणाले.

'370 नंतर आत्ता जम्मू कश्मीरमध्ये जमीन घेता येते. मला त्या राजकारणात पडायचे नाही. पण तुम्ही हिमाचलमध्ये गेला, आसाम, मणिपूरमध्ये गेला तर तुम्हाला तेथे जमिनीचा एक तुकडा विकत घेता येत नाही. मग आपल्याकडेच ही मोकळीक का दिलीये.या आणि आमच्या जमिनी घ्या. मराठी भाषेसोबत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय केले पाहिजे हे सरकराने बघितले पाहिजे.', असे आवाहन देखील सरकारला राज ठाकरे यांनी केले.

साहित्यिकांनी बोलले पाहिजे

राज ठाकरे म्हणाले की, साहित्यिकांनी मार्गदर्शन केले पाहिजे. साहित्यिकांनी बोललं पाहिजेत. मला कोणी आत्ता मत मांडताना दिसत नाही. साहित्यांनी फक्त पुस्तक लिहून चालणार नाही. चांगल काय वाईट काय हे सांगितले पाहिजे. जे साहित्यिक बोलतील त्यांचे पाहूनच वाचक पुस्तक घेणार आहे.

Raj Thackeray
BJP News : भाजपच्या पायगुणामुळेच आमदार नव्हे तर मंत्री झालात; अजितदादांच्या मंत्र्यांच्या विधानाला प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com