Shiv Sena Thackeray Party : सगळ्यांसाठी पालख्या वाहिल्या, आता शिवसैनिकांनी स्वतःसाठी लढायचं

Shiv Sena Thackeray strict stance on seat allocation : पुण्यात आज शिवसेना ठाकरे शिव संपर्क मेळाव्यात संजय राऊत यांनी जागा वाटपावर भाष्य केले. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण होण्याचे संकेत यातून निर्माण झालेत.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाले आहे. त्याची संकेत पुण्यात झालेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यात मिळाले.

"मागील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांसाठी पालखी वाहिल्या, आता शिवसैनिकांनी आपला विचार करावा", असे मत शिवसेना ठाकरे गटांचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

पुण्यात आज शिवसेना (Shiv Sena) ठाकरे शिव संपर्क मेळावा पार पडला. यामध्ये ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जागा वाटपावर भाष्य केले. आता कोणाच्याही प्रेमापोटी जागा वाटपामध्ये आपल्या हक्काच्या जागा गमावू नये, असं आवाहन वरिष्ठ नेत्यांनी केलं. तसेच पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी आणि कोथरूड या तीन जागांवर दावा केला आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut : संजय राऊतांनी टाकला नवा बॉम्ब, महाविकास आघाडीचं 'टेन्शन' वाढलं

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील जागा वाटपावरती भाष्य करत, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना जागा वाटपाबाबत कॉम्प्रमाईज करणार नाही, असा संकेत आहे. संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेची आहे. या प्रत्येक जागेवर यापूर्वी शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा लढण्याची तयारी शिवसेनेने करावी, असे सांगितले.

Sanjay Raut
Sushma Andhare : मोठी बातमी! पवारसाहेबांच्या 2 मतदारसंघासह कोथरूडवर शिवसेनेचा दावा; भरसभेत अंधारेंची मागणी

शिवसेनेने आत्तापर्यत खूप लोकांच्या पालख्या वाहिल्या आता स्वतःसाठी लढायचं आहे. काँग्रेसचा आमदार करण्यासाठी कसब्यात शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली. बारामतीत सुप्रिया सुळे यांना खासदार करण्यासाठी तुफान कष्ट केले. पण आता शिवसैनिकांनी स्वतःकडे पहिले पाहिजे, आता पहिली पसंती शिवसेना आणि उद्धव ठाकरे असले पाहिजेत, असं आवाहन संजय राऊत यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत एक, तर तू राहशील किंवा मी राहशील हा संदेश घेऊनच पुढे जायचं आहे. महाराष्ट्रात आता शिवसेनाच राहणार आहे. लोकसभेत अपेक्षित यश आपल्याला मिळालं नाही. मात्र विधानसभेची लढाई त्यापेक्षा तुंबळ होणार आहे .आपण राहण्यासाठी छातीचा कोट करून लढावं लागेल. राज्यात अनेक ठिकाणी आपण गाफिल राहिलो, नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेतून गेलाच होता, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

आपण विधानसभेच्या 288 उमेदवार उभे केले, तर 160 जागा निवडून येतील. मात्र आपण हा महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. तरी देखील महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडेच राहिला हवं यासाठी आपण जास्तीत जास्त आमदार निवडून द्यायच्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com