Ajit Pawar Politics : जनसन्मान यात्रेने अजितदादांना सोलापुरात काय दिले? दोन आमदार अपक्ष लढणार, पाटलांनी पक्ष सोडला...

NCP JanSanman Yatra : जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानस होता. मात्र, त्याचा विपरीत परिणाम सोलापूर जिल्ह्यात दिसून आला आहे.
Ajit Pawar-Babanrao Shinde-Sanjay Shinde-Umesh Patil
Ajit Pawar-Babanrao Shinde-Sanjay Shinde-Umesh PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 October : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. ही जनसन्मान यात्रा सप्टेंबरअखेर सोलापूर जिल्ह्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा आणि करमाळा या तीन मतदारसंघात या यात्रेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र, अजित पवारांनी पाठ फिरवताच दोन मतदारसंघातील आमदारांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तर एका मतदारसंघात पक्षातील बंडखोरीने उग्ररूप धारण केले आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे हे तीनही मतदारसंघ धोक्यात आले आहेत.

जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मानस होता. मात्र, त्याचा विपरीत परिणाम सोलापूर जिल्ह्यात दिसून आला आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ, माढा आणि करमाळा या तीन मतदारसंघात जनसन्मान यात्रा काढण्यात आली. या तीनही जागा पुन्हा मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असताना माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवार यांची साथ सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

माढ्यातून बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे या वेळी निवडणूक लढवणार आहेत. रणजित शिंदे यांना तुतारीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची बबनराव शिंदे यांची मनीषा आहे. मात्र, शरद पवार यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तुतारीकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे माढ्यात अजित पवारांनी सभा घेऊनही बबनराव शिंदेंनी साथ सोडल्याने माढ्यातून अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस मायनस झाल्याचे बोलले जात आहे.

माढ्यापूर्वी ही जनसन्मान यात्रा याच दिवशी मोहोळ मतदार संघात गेली होती. या मतदारसंघात पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यात राजकीय संघर्ष होता. मात्र, अनगर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उमेश पाटील आणि सहकाऱ्यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने अजितदादांच्या दौऱ्याच्या दिवशी ‘मोहोळ बंद’ पाळला.

Ajit Pawar-Babanrao Shinde-Sanjay Shinde-Umesh Patil
Prashant Paricharak : प्रशांत परिचारकरांच्या मनात तरी काय...तुतारीचा आग्रह मान्य करणार का?

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना निर्वाणीचा इशारा दिला. विशेषतः अजितदादांची भाषा उमेश पाटलांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येते. कारण, त्या भाषणानंतर उमेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला तसेच दोन दिवसांपूर्वी अजित पवारांची साथ सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. माजी आमदार राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव करणे, हेच आमचे ध्येय असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे जनसन्मान यात्रेनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फायदा होण्याऐवजी तोटाच होताना दिसत आहे.

मोहोळ, माढ्यानंतर संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्यासाठी करमाळ्यातही ही यात्रा घेण्यात आली. या यात्रेच्या निमित्ताने विविध विकास कामांचे भूमिपूजनही उरकरण्यात आले. संजय शिंदे यांना साथ देण्याचे आवाहन अजित पवारांनी करमाळ्याच्या जनतेला केले. मात्र, अजितदादांच्या सभेनंतर काही दिवसांतच संजय शिंदेंनी करमाळ्यातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

वास्तविक महायुतीमध्ये जागा वाटपासाठी मातब्बर नेते हाताशी राहणे अजित पवार यांना अधिक सोयीचे ठरले असते. त्यामुळे संजय शिंदे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील, असा शक्यता व्यक्त होत असतानाच त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने अजित पवारांच्या पदरात नेमकं काय पडलं, असा सवाल उपस्थित होत आहे.

Ajit Pawar-Babanrao Shinde-Sanjay Shinde-Umesh Patil
Indapur Politic's : राष्ट्रवादीतील बंड हर्षवर्धन पाटलांच्या आमदारकीच्या स्वप्नपूर्तीमध्ये अडथळा ठरणार?

जनसन्मान यात्रेनंतर दोन आमदारांनी (यातील संजय शिंदे हे मागील निवडणुकीतही अपक्षच होते) अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मजबूत मतदारसंघ मानले गेलेल्या मोहोळमधील पक्षातील दुफळीमुळे मतदारसंघच धोक्यात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जनसन्मान यात्रेने सोलापुरात अजित पवारांना काय दिले, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com