
Mumbai News : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. मात्र, सत्तास्थापनेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे त्यावेळेसपासून भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीरही केली होती, त्याशिवाय गेल्या दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत असल्याने त्यांची नाराजी लपून राहिलेली नव्हती. त्यातच आता आठ दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिलगिरी व्यक्त करत फोन आला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले होते. त्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामधील मतभेद दूर झाल्याची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज सप्ताहच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने पुन्हा सक्रिय होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळाली नसल्याने छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर शिर्डीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला केवळ दोन तास भुजबळ नावापुरतेच उपस्थित होते.
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामार्फतच छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला जात होता. अनेक वेळा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर बोलण्यास टाळाटाळ केली होती. शिर्डीतल्या राज्यव्यापी शिबीरातही काही तासांसाठी हजेरी लावत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण नाराज असल्याचे पुन्हा संकेत दिले होते.
आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिलगिरी व्यक्त करत फोन आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील मतभेद दूर झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्या या फोननंतर आता छगन भुजबळ यांची नाराजी दूर होते का, आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीत सक्रीय होतात का याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात होती.
त्यानंतरच्या काळात 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना' अशा स्वरूपाची आरपारची भाषा करणारे भुजबळ आता मात्र पक्षाच्या नेत्यांसोबत उपस्थित राहुन गप्पागोष्टी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता भुजबळांची राष्ट्रवादीवरील नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. छगन भुजबळांनी अनेक दिवसानंतर पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ छगन भुजबळांच्या हस्ते झाला. त्यामुळे येत्या काळात लवकरच भुजबळ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यक्रमात सक्रिय झाल्याचे पाहवयास मिळतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.