MLA Varsha Gaikwad Sarkarnama
देश

Dharavi News : 'हा' तर अदानींना लाख कोटींचा नफा देणारा प्रस्ताव..!

Amol Sutar

Dharavi News : धारावीचा विकास करायचा असेल तर तिथे कोण लोक राहतात, काय उद्योग चालतात याची माहिती घ्या. याबाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. धारावी ही धारावीकरांनी बनवलेली आहे. धारावी पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हणजे अदानींना लाख कोटींचा नफा देणारा प्रस्ताव असल्याचा आरोप करत काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

या पुनर्विकासात धारावीकरांवर प्रचंड अन्याय झाल्यामुळे आतापर्यंत अनेक आंदोलनेही करण्यात आली. मात्र धारावीकरांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न सरकार आणि 'अदानी'कडून सुरू आहेत. याचा तीव्र निषेध करीत धारावीकरांच्या हक्कांसाठी आज शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी शिवसेनेचा मोर्चा शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली 'अदानी'च्या 'बीकेसी'तील कार्यालयावर धडवणार आहे.

यावेळी काँग्रेस (Congress) आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, आम्ही धारावीसाठी एक चळवळ चालू केली होती. त्यात उद्धव ठाकरे यांचे हातभार मिळाला आहे. याबाबत आंदोलन करण्याचे कारण म्हणजे धारावी (Dharavi) ही धारावीकरांनी बनवलेली आहे. ज्या ठिकाणी आम्ही राहतो ती जमीन त्यांना महत्त्वाचे वाटते. पण येथे राहणारे लोक त्यांना महत्त्वपूर्ण नाहीत. आमच्या घरांबाबत तसेच येथील उद्योगधंद्यांबाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही.

हा प्रस्ताव म्हणजे अदानींना (Adani) फक्त फायदे दिले जात आहेत. यातून एक लाख कोटींचा नफा त्यांना होणार आहे. यामध्ये टीडीआर मोठ्या प्रमाणात आकारण्यात आला आहे. धारावीच्या क्षेत्राच्या सहा ते सात पटीने आकारण्यात आला आहे. दहा कोटी चौरस फुटांचे बांधकाम यामध्ये देत आहे. मात्र याचा आमच्या लोकांना काय फायदा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जनतेला एवढेच सांगू इच्छितो, ना आपली संख्या वाढली आहे. जो सर्वे आधी झाला आहे तो सर्वे देण्यात आला आहे का ? २०११ च्या सर्वेनुसार दिलेल्या सर्वे वरून काम होणार आहे काय ? असे प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केले आहेत. मोदी फक्त आपल्या मित्राला फायदा करुन देण्याच्या विचारात आहेत. पण आपल्या मित्राला किती मदत करायची याला प्रमाण असते.

हा प्रकल्प शासनाच्या माध्यमातून व्हावा यासाठी 2004 ला प्रस्ताव देण्यात आला. मात्र हा प्रस्ताव अदानींच्या घशात घालण्यात आला. धारावीचा विकास करायचा असेल तर तिथे कोण लोक राहतात हे काय उद्योग चालतात याची माहिती घ्या, असा सल्ला गायकवाड यांनी दिला आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT