Manoj Jarange Patil & His mother Sarkarnama
विशेष

Jarange Patil's Mother Reaction : महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा-बाळांचं कल्याण झालं; मनोज जरांगेंच्या आईची प्रतिक्रिया

Vijaykumar Dudhale

Mumbai News : मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या सात महिन्यांपासून जिवावर उदार होत मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यांच्या लढ्याला यश आले असून मराठ्यांना आरक्षण मिळालं, याचा आज आनंद झाला. महाराष्ट्रातील साऱ्या मराठ्यांच्या लेकरा-बाळांचं कल्याण झालं, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांच्या आईने आपल्या मुलाच्या यशावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Reaction of Manoj Jarange Patil's mother after Maratha reservation demand accepted)

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील हे उपोषणासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठाबांधव आहेत, त्यामुळे मुंबईत सर्वत्र मराठाबांधव दिसत आहेत. सरकारने जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजाने जल्लोष केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील यांच्या आईने आपली भावना व्यक्त केली. (Jarange Patil's Mother Reaction )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे-पाटील यांनी गंगापूर, जालना, अंबड, अंतरवाली सराटीत उपोषण केले आहे. गेल्या सात महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांचा लढा सुरू होता. आज मराठ्यांना आरक्षण मिळालं, आज आनंद झाला. महाराष्ट्रातील साऱ्या मराठ्यांच्या लेकरा-बाळांचं कल्याण झालं. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जिवाचं रान केलं, असेही त्यांच्या आईने सांगितले.

त्या म्हणाल्या, स्वतःची लेकरंबाळं सोडून त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभारला. गेल्या सात महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील यांनी घराचा उंबराही ओलांडला नाही. त्यांनी आपल्या लेकरा-बाळांचं तोंडसुद्धा बघितलं नाही. त्यांच्या कष्टाला फळ मिळालं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा होता. त्या सर्वांचंही मागणी मान्य झाल्यामुळे कल्याण झाले आहे. आम्हाला त्याबद्दल आई म्हणून आनंद वाटतो.

मनोज जरांगे पूर्वी आंदोलन करायचे, तेव्हा काही वाटत नव्हतं. मात्र, जालन्यातील अंतरवाली सराटीतील घटना घडल्यापासून काळजी वाटत होती. अवघड दिसत होतं. आम्ही आपलं गावरान माणसं, आम्हाला काही माहिती नसतं. मुंबईला गेल्यापासून मनोज जरांगे-पाटील यांच्याशी आमचे कोणतेही बोलणे झालेले नाही. मात्र, मराठा आरक्षण मिळाल्यामुळे आम्हाला आनंद वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या घरच्यांनी सांगितले, आरक्षण मिळाल्यामुळे आम्हाला आज आनंद झाला आहे. त्यांनी भरपूर संघर्ष केला आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभा होतो. मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी नुसतं दर्शन घेतलं. आमच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. मराठा समाजासाठी जरांगे-पाटील यांनी जिवाचे रान केले. त्यांनी जिवावर उदार होऊन उपोषणं केली. गेले दोन दिवस तर ते पाणीसुद्धा घेत नव्हते. त्यामुळे आमच्या जिवाला घोर लागून राहिला होता. मात्र, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जरांगे-पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.

मनोज जरांगे यांनी केलेला संषर्घ सोपा नव्हता. मात्र, त्यांच्यावर लाठीजार्च झाला, अनेक डाव टाकण्यात आले. मात्र, ते कोणालाही बधले नाहीत. ते संघर्ष करीत राहिले. त्यांचा संषर्घ शब्दांत न मांडता येण्यासारखा होता, असेही त्यांच्या घरातील लोकांनी स्पष्ट केले.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT