
Jammu And Kashmir News : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (ता.22) दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र,या हल्ल्यामागं पाकिस्तान कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू काश्मीर पहलगाममध्ये (Pahalgam Terroist Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना पहिल्यांदा त्यांचा धर्म विचारला, पर्यटकांनी जेव्हा त्यांना हिंदू असल्याचं सांगितलं,त्यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
आता या हल्ल्यानंतर पाकिस्तानी (Pakistan) लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं हिंदू विरोधातील चिथावणीखोर भाषण असल्याची शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी बुधवारी (ता.16) इस्लामाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र वेगवेगळे कसे झाले? यावरही भाष्य केलं होतं.
आपल्या पूर्वजांना आपण प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे असून आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती, परंपरा, विचार आणि महत्त्वाकांक्षाही वेगळ्या आहेत. त्यामुळे तिथेच द्विराष्ट्रीय सिद्धांताचा पाया रचला गेला. आपण आता दोन राष्ट्रे आहोत, एक राष्ट्र नाही. आपल्या पूर्वजांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला. त्यामुळे आपल्याला देशाचं रक्षण कसं करायचं याची माहिती असल्याचाही दावाही मुनीर यांनी या कार्यक्रमात केला.
असीम मुनीर यांनी आपल्या भाषणात असीम मुनीर यांनी परदेशी पाकिस्तानी नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहनही केल्याचं दिसून आलं. आतापर्यंत तुम्ही आपल्या देशाप्रतिचे प्रेम सिद्ध केले आहेत आता इथे आर्थिक गुंतवणूक करा. एका उत्कृष्ट विचारसरणीशी तुम्ही जोडलेले आहात, हे तुम्ही कधीही विसरता कामा नाही.जगातील दोनच ठिकाणे अशी आहेत,जी अल्लाहच्या उक्तिंच्या आधारे तयार झाली आहेत.त्यात एक मदीना आणि दुसरे पाकिस्तान असंही त्यांनी म्हटलं.
असीम मुनीर यांनी यावेळी भारत,हिंदू धर्म यासोबतच काश्मीर आणि गाझासारख्या मुद्द्यांवरही आक्रमकपणे आपले विचार मांडले. तसेच त्यांनी काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग असून त्याला कोणीही आमच्यापासून वेगळं करू शकत नसल्याचा दावाही लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सांगितल.
पहलग्राममधील या हल्ल्यामागे टीआरएफ दहशवादी संघटनेचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जाते आहे. सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे. हल्ल्यासाठी आलेले दहशतवादी हे पोलिसांच्या वेशात आले आणि त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोदी सरकारनं आपल्या दुसर्या टर्ममध्ये जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवलं होतं.त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.त्यामुळेच या पर्यटकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी,त्यांची संख्या कमी करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्यामुळे मोदी सरकारला विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.