Aditya Thackeray Letter : वातावरण तापलेलं असतानाच आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Aditya Thackeray Letter to devendra Fadnavis : मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आम्ही असा वाया जाऊ देणार नाही, मुंबईची होत असलेली वाताहत आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही!, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिली.
Aditya Thackeray Letter to devendra Fadnavis
Aditya Thackeray Letter to devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray News : दिशा सालियानी प्रकरणानरून महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे. दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केले. या सगळ्यांमध्ये आदित्य ठाकरेंनी वेगळ्याच कारणासाठी आज (शनिवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

'मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून जिथे तिथे रस्त्यांची कामं सुरु आहेत, रस्ते बंद आहेत, धूळीचं साम्राज्य आहे. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे सरसकट कॉक्रिटीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची तिजोरी रिकामी करण्याचा हा महाघोटाळा सुरु आहे.', असे सांगत मुंबईतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला असून त्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे केली आहे.

Aditya Thackeray Letter to devendra Fadnavis
Narayan Rane taunt Ajit Pawar : ''अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय..'' ; नारायण राणेंनी लगावला टोला!

आदित्य ठाकरेंनी सांगितले की, आज पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ह्या घोट्याळ्याची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आणि त्यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आम्ही असा वाया जाऊ देणार नाही, मुंबईची होत असलेली वाताहत आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही!, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरेंच्या पत्रात काय?

2023-2024 या कालावधीत सुरू झालेल्या मुंबईतील या सर्व रस्त्यांच्या कामाची आणि त्यातील टेंडर प्रक्रियेमधील घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी इओडब्ल्यूतर्फे लवकरात लवकर चौकशी सुरू करून सदर प्रकरणात सहभागी असलेल्या कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व इतर दोषी व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

नारायण राणेंना प्रत्युत्तर

नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, यांना पगार मिळतो घाण आरोप करण्याचा. ते टीका करतात पण आपण कचऱ्याकडे लक्ष नाही द्यायचे. त्यांनी माझ्या वडिलांवर आरोप केले, आमच्या पक्षावर बोलले पण आम्ही या कचऱ्याकडे लक्ष नाही देत.

Aditya Thackeray Letter to devendra Fadnavis
Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांकडून राष्ट्रगीताचा अवमान?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com