Uday Samant: 'इंडिया' आघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही; मंत्री सामंतांची टोलेबाजी

Uday Samant On Narendra Modi: लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, उदय सामंत यांचा विश्वास
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया' आघाडीने बैठकांचा धडाका लावला आहे. देश पातळीवर मोट बांधण्याची 'इंडिया' आघाडीने केलेल्या तयारीबाबत मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टोलेबाजी केली. ' त्यांच्या किती जरी बैठका झाल्या तरी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार नाही व खासदारकीच्या निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील', असा ठाम विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

त्यांच्याकडे पंतप्रधान मोदी यांच्यासमोर उमेदवारच नाही. तीन राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला आहे, हे त्यांना माहिती आहे, असा टोलाही उदय सामंत यांनी 'इंडिया' आघाडीच्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत लगावला. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, त्यांचे आरक्षण कुठेही काढून न घेता आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, अशी सरकारची भूमिका असल्याचे सामंत यांनी रत्नागिरीत स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
Praveen Darekar News : 'संजय राऊतांना किंमत देऊ नका', प्रवीण दरेकर भडकले

आरक्षणाबाबत सातत्याने जरांगे-पाटील आणि भुजबळ करत असलेल्या वक्तव्यांबाबतही सामंत यांनी त्यांना पुन्हा एकदा विनंती केली. जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत सामंत यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, त्यांना आता रोज काय सांगायचं आपण त्यांना विनंती केली आहे, महाराष्ट्राला एकत्र राहण्याची परंपरा आहे.

आपण सगळे जात, पात, धर्मभेद विसरून एकत्र मिळून राहतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही आणि मराठा समाजालाही आम्ही आरक्षण देणार आहोत. त्यामुळे जरांगे-पाटील आणि भुजबळसाहेबांना माझी विनंती आहे, जाती-धर्मांमध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी टाळली पाहिजेत, अशी विनंती सामंत यांनी केली.

जरांगे-पाटील 20 जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करणार, तशा पद्धतीने त्यांनी ती मुदतवाढ सरकारला दिलेली असावी, असे आपण वर्तमानपत्रापासून वाचले आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा सरकार म्हणून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

माजी मंत्री केदार यांना झालेल्या अटकेबाबत उदय सामंतांनी (Uday Samant) रोज सकाळी कोण पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात की, यामध्ये सुद्धा सरकारचा हात आहे, अशी बोचरी टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता केली. केदार यांना आता अटक झाली असली तर ते प्रकरण वर्षानुवर्षे सुरू होते. त्यामध्ये न्यायालयाने दिलेला निकाल आहे, तो निकाल अजून मी वाचला नाही. पण शिक्षा झाल्याचे माहीत आहे, असेही सामंतांनी सांगितले.

(Edited By - Ganesh Thombare)

Uday Samant
Ramesh Chennithala: महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्निथला कोण आहेत ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com