"50 खोके" म्हणताच शिवसेना आमदाराच्या पत्नी आंदोलकांना भिडल्या, महिला नेत्यानेही चांगलेच फटकारलं

Shiv Sena Vs Shekap : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे दोन पक्ष तयार झाले आहेत. यानंतर आजही शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरूद्ध 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या जात आहेत.
Raigad politics
Raigad politicssarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वादात शेकाप आंदोलनामुळे नवा संघर्ष उद्भवला आहे.

  2. शेकापने “५० खोके एकदम ओके” अशा घोषणाबाजीसह काळे झेंडे दाखवत आंदोलन केले.

  3. या आंदोलनामुळे रायगडमध्ये शिवसेना-शेकाप संघर्ष चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Raigad News : रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी विरूद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा वाद रंगला आहे. अशातच आता शिवसेना शेकाप असा नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. शेकापने केलेले आंदोलन, 50 खोके एकदम ओकेच्या दिलेल्या घोषणा आणि दाखवलेले काळे झेंडे यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.

रोहा तालुक्यांत रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच कळणे दुरापास्त झाले आहे. तसेच अेक प्रश्न प्रलंबित असून मिठेखार येथे दरड कोसळून दुर्घटनाही घडली आहे. यावरून शेकापने नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. तसेच स्थानिक प्रतिनिधींवर प्रश्नांचा भडीमारा केला. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या.

Raigad politics
Raigad Politics : रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; 'गोगावलेंना' शांत बसवण्यासाठी तटकरेंची जुन्या मित्राला साद?

यावरून शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी चित्रलेखा पाटील यांच्यावर धावून गेल्या. ज्यानंतर वाद निर्माण झाला. त्याचा निषेध अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे बॅनर आणि घोषणा देऊन केला. यामुळे रायगडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.

मुरूड परिसरात दरड कोसळून विठा गायकर या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याचवेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवीही तेथे दाखल झाल्या. यावेळी पाटील यांनी या घटनेत कोणतेही राजकारण न आणता दोषींवर कारवाई केली पाहिजे. किती दिवस असेच चालणार आमच्या जीवनाची किंमत आहे की नाही. गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच सध्या पन्नास खोके काय? कोण काय? हे राजकारण घाणेरडं चालल्याचेही त्या म्हणाल्या. पाटील यांनी खोक्यांचा उल्लेख करताच मागे उभ्या असलेल्या मानसी दळवी पाटील यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती चिघळली नाही.

Raigad politics
Guardian Minister of Raigad Politics : 'भरत'शेठच्या पालकमंत्री पदावर उदय शोधतोय राम'बाण' उपाय

FAQs :

प्र.१: रायगडमध्ये आंदोलन का झाले?
उ: शेकापने “५० खोके एकदम ओके” अशा घोषणांसह आंदोलन केले.

प्र.२: कोणत्या पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे?
उ: शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादानंतर आता शिवसेना-शेकाप संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

प्र.३: या आंदोलनात काय विशेष झाले?
उ: काळे झेंडे दाखवण्यात आले आणि घोषणाबाजीमुळे राजकीय वाद वाढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com