
शिंदे गटाचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर तीव्र टीका केली.
दळवी यांनी तटकरे हे रायगड आणि महाराष्ट्राला फसवणारे नेते असल्याचा घणाघाती आरोप केला.
या वक्तव्यामुळे रायगडसह महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Raigad News : रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून सुरू असणारा वाद आता महायुतीच्या तुटण्याचे कारण बणण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी तटकरेंच्या संपूर्ण राजकीय कुरघोड्यांचा पाढा वाचत जोरदार टीका केलीय. तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते असून, त्यांचं कामच फसवणूक करणं आहे असा घणाघाती आरोप दळवींनी केला आहे. ज्यामुळे आता रायगडचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. ते रोहा येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप मिटलेला नाही. पालकमंत्रीपदासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घरी स्नेह भोजनाला नेत पालकमंत्रीपदासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली. तर शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी हा प्रश्न तिन्ही पक्षाचे नेते बसून सोडवतील. पण ते मलाच मिळेल असे म्हणत पालकमंत्री पदावार आजही दामा कायम ठेवला आहे. नुकताच त्यांनी यावर भाष्य करताना जिल्ह्याचे पालमकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असाही दावा केला होता.
अशातच गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आमदार महेंद्र दळवी सतत एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करत असतात. तसेच ते तटकरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडत असतात. मध्यंतरी देखील त्यांनी यावरून टीका करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त भाजपसोबतच युती करू असे भाष्य केले होते. ज्यानंतर रायगडसह राज्यभर या वक्तव्याची चर्चा झाली होती.
यानंतर आता पुन्हा एकदा दळवी जिल्ह्यात महायुतीला मूठमाती देण्याचे काम केले आहे. दळवी यांनी, आमागी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीबरोबर कधीच युती होणार नाही, असेही जाहीर करून तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी तटकरेंच्या राजकीय कुरघोड्यांवर हल्लाबोल करताना तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते आहेत. त्यांचे कामच फसवणूक करणे असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
दळवी यांनी तटकरे यांचा उल्लेख नालायक असा करत महायुतीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधीही युती करणार नाही. आम्ही ‘एकला चलो’ च्या भूमिकेत असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
तसेच तटकरेंनी गोगावले यांच्या आईच्या नावावरून केलेल्या राजकारणावरून जोरदार टीका करत तटकरेंना गोगावलेंच्या आईचा अवमान करणं शोभत नाही. रायगडकर हे कधीही सहन करणार नाहीत, असा इशाराही दळवींनी दिला आहे.
प्र.१: महेंद्र दळवी कोण आहेत?
उ: ते एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना आमदार आहेत.
प्र.२: त्यांनी कोणावर आरोप केला?
उ: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्यावर.
प्र.३: दळवी यांनी काय वक्तव्य केले?
उ: तटकरे हे रायगड आणि महाराष्ट्राला फसवणारे नेते असून त्यांचं कामच फसवणूक करणं आहे.
प्र.४: या वक्तव्यामुळे काय परिणाम झाला?
उ: रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात राजकीय तणाव वाढला आहे.
प्र.५: सुनील तटकरे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
उ: ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.