
Kolhapur News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रोज रोज धक्के का बसत असतील, त्यामुळे त्यांनी कारणं शोधली पाहिजेत. भुंकपाचे केंद्र आणि उगमस्थान काय आहेत, कोठे तयार होतात. हे शोधण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी करावे, असा टोला राज्याचे पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पंढरपूर येथील स्कायवॉक रद्दच्या प्रश्नात देखील हात घातला. या स्कायवॉकची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द केली आहे. यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
2019 ला आम्ही सांगत होतो, पण आमचे ऐकले नाही. धक्क्यांचा अंडर करंट काय आहे, धक्का त्यांना का बसतो त्यांनी तो शोधला पाहिजे, याचा विचार माजी आमदार वैभव नाईक यांनी करावा असे म्हटलं आहे. तर शिवसेनेला बसणारे धक्क्यांचे कारण काय याबाबत पक्षप्रमुखांना विचारावे असाही चिमटा वैभव नाईक यांना काढला. वैभव नाईक यांना उद्धव ठाकरेंना का भेटता येत नाही? त्यांचा संपर्क होतो का नाही? हे आता त्यांना माहिती, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांचा समाचार शंभूराज देसाई यांनी घेतला आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना बोलत होते.
पर्यटन विभागाचा कार्यभार दोन महिने झाले माझ्याकडे आला आहे. पूर्वीचे प्रकल्प मार्गी लावणे हेच आपले ध्येय आहे. ज्या ठिकाणी संधी आहे. त्याचा टप्याटप्याने विकास करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आहेत. रायगड जिल्ह्यातील पाचाड मध्ये शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक उभारणार आहे. अशी माहितीही यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.
मंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी पंढरपूर येथे स्कायवॉक उभारण्यास परवानगी दिली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ती परवानगी रद्द केली. त्यावर बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले, मला याबाबत माहिती नाही, मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला आहे. याची कल्पना मला नाही. पण जाणीवपूर्वक टार्गेट केले जातयं असं काही नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीतून भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री असताना दोन्ही उपमुख्यमंत्री विचारल्याशिवाय निर्णय घेत नव्हते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो निर्णय नेमका का घेतला याची माहिती त्यांना भेटून चर्चा केल्याशिवाय कळणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
यावेळी भाजप प्रवेशांच्या चर्चांवर आणि दाव्यावरून प्रश्न केला असता, महायुतीत शिवसेनेमध्ये कोणाचा पक्ष प्रवेश होणार याची माहिती आम्ही जाहीर सांगत नाही. पण शिवसेनेत मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान शक्तीपीठ महामार्गावरून बोलताना, शेतकऱ्यांचा विरोध डावलून कोणतेही गोष्ट करायचा नाही असे ठरले आहे. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन हे सरकार काम करेल, विश्वास मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.