
Kolhapur News : राज्यात सध्या शिवसेना ठाकरे गटाला महायुतीने लक्ष केलं असून शिवसेना फोडली जातेय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर असं नाव देऊन ठाकरे गटाचे अनेक शिलेदार आपल्याकडे खेचले आहेत. यावरून ठाकरे गटाचे माजी आमदार आमदार वैभव नाईक यांनी, शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर असं नाव दिलेलं असलं तरी खरंतर त्यांचं ऑपरेशन गद्दारी सुरू असल्याटी टीका केली आहे. ते कोल्हापुरमध्ये बोलत होते.
वैभव नाईक यांनी, जे आधी शिंदे सेनेत गेले नाहीत त्यांना आता गद्दारी करण्यासाठी जुने गद्दार भाग पाडत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 70- 80 दिवस झाले. अद्याप देखील आरोपी सापडत नाही. राज्यातले कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस दिवसेंदिवस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पंख छाटत आहेत आणि यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ऑपरेशन टायगरचा प्रयत्न करत आहेत, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.
शिवसेना उभे करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाम आहेत. ज्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री बनवलं असे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे उद्धव ठाकरेंवर आता टीका करत असल्याचा टोला देखील वैभव नाईक यांनी लगावलाय.
मराठी देवीच्या यात्रेला राज्यातून वेगवेगळी नेते येत असतात. यात्रेमध्ये कोणतेही राजकारण आणणार नाही. आम्ही सर्वाचे स्वागत करू, त्यांचे देखील स्वागत करू, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कोकणातील आंगणेवाडीतील यात्रेच्या येणार आहेत. या प्रश्नावरून बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.
माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्चपासून त्यांचे दौरे सुरू होतील. लोकांना ते भेटत आहेत. लोकांना पुन्हा एकदा विश्वास देण्याचा आणि उभा करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करू. त्यांना एवढे धक्के बसून देखील त्यांच्या मागे अजूनही लोक आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी आहे हे येत्या काळात आम्ही दाखवून देऊ, असाही विश्वास नाईक यांनी व्यक्त केलाय.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबत बोलताना, आता काही गोष्टी प्रताप सरनाईक यांच्या हातात राहिल्या नाहीत. एसटीमध्ये बदल करण्याचा कोणताही अधिकार त्यांना राहिलेला नाही. त्यामुळे ते काय बोलत आहेत हे पाहण्याची गरज नाही. असे सांगत माजी आमदार वैभव नाईक यांनी आपला मोर्चा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला. आजारी पडायच्या आधी 40-50 दिवस त्यांच्यावर आरोप होत आहे. त्याचे उत्तर त्यांनी कधी दिलेलं नाही. मग आजारी असताना उत्तर देण्याची अपेक्षा का ठेवावी? असा खोचक सवाल देखील नाईक यांनी केला आहे.
तर कृषिमंत्री कोकाटे लोकांपासून दूर होत आहेत हे दिसत आहे. या सरकारमध्ये गेल्या वेळी ज्या पद्धतीने संजय राठोड आणि काही वादग्रस्त मंत्री होते. त्या पद्धतीने या सरकारमध्ये देखील आहेत. या सर्वांना अभय आहे. विरोधी पक्षांना विनंती आहे. यांना कोणी राजीनामा मागू नका कारण हे सरकार काहीही ऐकत नाही ..
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भूषण असून मागच्या वेळी दुर्दैवाने सिंधुदुर्ग किल्ल्या समोरील स्मारक पडले. आता त्याच जागी नवे स्मारक होत आहे. मागच्या स्मारकात दुर्दैवाने भ्रष्टाचार झाला आणि पुतळा कोसळला होता. आता तेथे पुन्हा स्मारक होत असून सत्ताधारी वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. ज्यांच्या काळात पुतळा बसवला तो पडला. त्यामुळे या सत्ताधारी नेत्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. केवळ हे स्मारक कशा पद्धतीने चांगले होईल याकडे लक्ष द्या, असा सल्ला देखील नाईक यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.