Shivsena Vs BJP : विशाळगडची दंगल ही विधानसभेपूर्वीची ट्रायल, ठाकरे गटाचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Shivsena Thackeray Group On Vishalgad Encroachment : "विशाळगड येथील दंगलीस राज्य सरकार जबाबदार आहे. पावसाळ्यात अतिक्रमणाची मोहीम कशी काय सुरू होऊ शकते? पोलिसांनी चार दिवसानंतर सायबर कलम लावले. मागील चार दिवस पोलिस काय करत होते?"
Vishalgad Encroachmen, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Vishalgad Encroachmen, Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 18 July : विशाळगड (Vishalgad) येथील हिंसाचाराच्या घटनेमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करत, गुरुवारी (ता. 18 जुलै) शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर पोलिस महानिरीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांची निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी, अशी मागणी यावेळी ठाकरे गटाने केली. तसंच भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप (BJP) राज्य अस्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शिवसेना ठाकरे गटाने केला.

विशाळगड येथील दंगलीस राज्य सरकार जबाबदार आहे. पावसाळ्यात अतिक्रमणाची मोहीम कशी काय सुरू होऊ शकते? पोलिसांनी चार दिवसानंतर सायबर कलम लावले. मागील चार दिवस पोलिस काय करत होते? असे प्रश्न उपस्थित करत या दंगलीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा हात असून विशाळगडावरील हिंसाचार ठरवून केला आहे. त्याला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांची साथ असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी केला.

Vishalgad Encroachmen, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Video Uddhav Thackeray: पवार-पटोलेंना 'शॉक'; उद्धव ठाकरेंचा नवा डाव ; मित्रपक्षांच्या मतदारसंघावरच घाव

भाजपला महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा आहे

तर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, "विशाळगडची दंगल ही विधानसभा निवडणुकीपूर्वीची ट्रायल आहे. विशाळगडची दंगल ही राज्य सरकार जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचा पूर्व नियोजित कट आहे.

Vishalgad Encroachmen, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Sanjay Raut : पवारसाहेब नटसम्राट तर भुजबळ फिरता रंगमंच..., संजय राऊत असं का म्हणाले?

अतिक्रमण हे काढलेच पाहिजे, पण हे दंगलीपूर्वी काढणे गरजेचे होते. भाजपला महाराष्ट्र अस्वस्थ आणि नेहमी धगधगता ठेवायचा आहे. त्यांना दोन समाजात तेढ निर्माण करायचा आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी केली पाहिजे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com