
Solapur, 08 December : बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे अधिकार केवळ निवडणूक आयोग आणि आयोगाच्या वतीने प्रशासनाला आहेत. बाकी कोणालाही कोणत्याही कायद्यानुसार अधिकार देण्यात आलेले नाहीत. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे मरकडवाडीत मतदान का करू दिलं नाही. जर ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करू शकतात पण, स्वतः त्यांना असे मतदान घेता येणार नाही, असे स्पष्टीकरण सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
‘ईव्हीएम’वर अविश्वास दाखवत मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ‘मॉकपोल’ची मागणी केली होती. मात्र, ती मागणी प्रशानसाने नाकारली. ते नाकारण्याचे कारण सोलापूरचे (Solapur) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज (ता. 08 डिसेंबर) स्पष्ट केले.
ते म्हणाले, ता. 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली. पण त्यानंतर 29 नोव्हेंबरला मारकडवाडी (Markadwadi) ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती. पण तो अधिकारी ग्रामस्थांन नसल्याने त्यांचे निवेदन अमान्य करण्यात आले
जिल्हाधिकारी (Collector) म्हणाले, ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतः मतदान घेता येत नाही. पोलिस नीट काम करतं नाहीत; म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येतं नाही. त्याचं पद्धतीने स्वतःला मतदान घेता येत नाही.
मारकडवाडीत तीन मतदान केंद्रे होती. 96 नंबर बूथमध्ये 4 पोलिंग एजंट होते, 97 नंबर मध्ये 4 पोलिंग एजन्ट, 98 मध्ये 3 उपस्थित होते. ज्यांनी आता आक्षेप घेतलेत, त्यांचेही प्रतिनिधी ‘मॉकपोल’ वेळी उपस्थित होते. मॉकपोल सर्टिफिकेट आम्ही घेतो, तेव्हा पोलिंग एजंटची सही आम्ही त्याच्यावर घेतो, या एजंटनी सही केलेली आहे, असेही आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, ईव्हीएममध्ये कुठल्याही पद्धतीची कनेक्टीव्ही नाही, त्यामुळे हकिंगचा प्रश्न नाही. जिथं ईव्हीएम असतात, तिथं पूर्णपणे सीसीटीव्ही असतात, हे पाहण्याची मुभा राजकीय पक्षांनाही आहे. पाच व्हीव्हीपॅटची मोजणी करणे आम्हाला बंधनकारक आहे. राजकीय पक्षाना अर्ज करून या पाच पैकी कोणतेही व्हीव्हीपॅट मोजण्यास सांगता येतं. पण मारकडवाडीतून कोणीही व्हीव्हीपॅट मोजण्यास अर्ज केलेले नाही
जरं एखाद्यावर आरोप करायचे असतील, तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. पण आतापर्यंत कोणती हे पुरावे यांनी दिलेले नाहीत. मारकवाडीमध्ये जी चाचणी केली जाणार होती, त्याची क्रेडिबिलीटी काय होती? ईव्हीएमवर ज्याला मतदान केलं, त्यालाच बॅलेटवर मतदान केलं जाईल, याची काय खात्री? असा सवालही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित केला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.