Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाची मोठी पिछेहाट झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 20 जागा मिळाल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी चर्चा आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.
आठवले म्हणाले, 'मला वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार नाही. आणि येत असतील तर येऊ नये असे माझे मत आहे. ते एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. कारण राजकारणामध्ये फेल झालेले हे दोन्ही नेते आहेत.'
'विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात फार फरक पडणार नाही. ', असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला.
राज ठाकरे यांना महायुतीमध्ये येणार असल्याचीही चर्चा आहे. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, त्यांनी आम्हाला अडचण नाही. लोकसभेला ते आमच्या सोबत होते. पण मुंबई शहरात उत्तर भारतीय, गुजराती आहेत. त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी भाजपला विनंती करणार आहे की राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नका.
संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली.त्यावरू रामदास आठवले म्हणाले, संजय राऊत जे बोलतात त्याकडे फार लक्ष दिले नाही पाहिजे. नीलम गोऱ्हा या विकृत बाई असे ते बोलत असतील तर त्यांनी माफी मागितली पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.